शहरं
Join us  
Trending Stories
1
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
2
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
3
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
5
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
6
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
7
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
8
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
9
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
10
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
11
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
12
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
13
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
14
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर
15
'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप
16
Akshaya Tritiya 2024 ला सोनं खरेदी करणार असाल तर मोबाइलमध्ये ठेवा 'हे' App; फसवणूक होणार नाही
17
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
18
मुस्लिमांना कुठे, किती अन् कसं मिळते आरक्षण; भारतीय संविधानात काय म्हटलंय? जाणून घ्या
19
गुरु-शुक्र अस्तंगत: अडीच महिने विवाह मुहूर्त नाही? जुलैनंतर थेट नोव्हेंबरमध्ये सनई चौघडे
20
वडिलांच्या गैरहजेरीत अनेकदा नातेवाईकांनी दिला होता सनीला चोप; म्हणाला, 'रक्त येईपर्यंत मी...'

मनपाचे अभियंते म्हणतात, लोकांच्या ये-जा केल्याने रस्ते झाले खराब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:57 PM

अहवालात मनपाच्या संबंधित अभियंत्यांंनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ‘क्युरिंग’ कालावधी संपला नसताना नागरिकांनी वाहनांची ये-जा केल्याने काही ठिकाणी रस्ते नादुरुस्त (खराब) झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे.

ठळक मुद्देरस्त्यांच्या कामांसंदर्भात कोणतीही तपासणी करण्यात आली नसून, त्यामुळेच रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याची स्थिती आहे.रस्त्याच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १४ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे स्पष्टीकरण सादर केले होते. रस्त्यावरून वाहनांची ये-जा केल्याने रस्ते काही ठिकाणी नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे अभियंत्यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे.

अकोला: शासन निधीतून शहरात पूर्ण करण्यात आलेल्या दोन रस्ते कामांचा अहवाल महानगरपालिका आयुक्तांनी शनिवारी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. या अहवालात मनपाच्या संबंधित अभियंत्यांंनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ‘क्युरिंग’ कालावधी संपला नसताना नागरिकांनी वाहनांची ये-जा केल्याने काही ठिकाणी रस्ते नादुरुस्त (खराब) झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे.शासनाकडून प्राप्त विशेष निधीतून आणि खड्डेमुक्त रस्ते अभियान अभियानांतर्गत शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे; परंतु अकोला शहरात काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांना एक वर्षाचा कालावधी झालेला नसताना, त्यापैकी अनेक रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. शहरातील टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट, अग्रसेन चौक ते दुर्गा चौकपर्यंतच्या रस्ते कामाची पाहणी केली असता, रस्त्यांच्या कामांसंदर्भात कोणतीही तपासणी करण्यात आली नसून, त्यामुळेच रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्याची स्थिती आहे. त्यामुळे रस्त्यांची कामे करणाºया संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांचे स्पष्टीकरण अभिप्रायासह सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी मनपा आयुक्त व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना १३ जुलै रोजी बजावलेल्या नोटीसद्वारे दिला होता. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या अशोक वाटिका ते सरकारी बगिचापर्यंत रस्त्याच्या कामासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी १४ जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे स्पष्टीकरण सादर केले होते. त्यानंतर टॉवर चौक ते रतनलाल प्लॉट चौक आणि अग्रसेन चौक ते दुर्गा चौक या दोन रस्ते कामांचा अहवाल मनपा आयुक्त जितेंद्र वाघ यांनी मनपाच्या शहर अभियंता, कार्यकारी अभियंता व उपअभियंत्यांच्या स्पष्टीकरणासह २० जुलै रोजी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला. या अहवालात मनपाच्या शहर अभियंता, कार्यकारी अभियंता आणि शहर उपअभियंत्यांनी स्पष्टीकरण सादर केले आहे. त्यानुसार संबंधित दोन्ही रस्ते कामांचा ‘क्युरिंग’ कालावधी संपला नसताना नागरिकांनी रस्त्यावरून वाहनांची ये-जा केल्याने रस्ते काही ठिकाणी नादुरुस्त झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे अभियंत्यांनी स्पष्टीकरणात म्हटले आहे. त्यामुळे मनपा अभियंत्यांच्या लेखी लोकांच्या राबत्याने रस्ते खराब झाल्याचे स्पष्ट होत आहे.

वापरलेले साहित्य चांगल्या दर्जाचे; रस्त्यांचा ३ टक्केच पृष्ठभाग खराब!दोन्ही रस्त्यांच्या कामांत वापरण्यात आलेले साहित्य चांगल्या दर्जाचे होते. तसेच दोन्ही रस्ते कामांच्या संपूर्ण क्षेत्राच्या अंदाजे ३ ते ४ टक्केच रस्त्याचा पृष्ठभाग खराब झाला आहे, असा दावाही मनपाच्या अभियंत्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात केला.जिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार दोन रस्ते कामांचा अहवाल संबंधित अभियंत्यांच्या स्पष्टीकरणासह जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे.- जितेंद्र वाघ, आयुक्त, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका