शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

स्थगिती उठविली; ग्रामसभांना परवानगी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:18 IST

संतोष येलकर अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांच्या आयोजनावर ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असून, ‘फिजिकल ...

संतोष येलकर

अकोला: कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ग्रामसभांच्या आयोजनावर ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात आली असून, ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ तसेच कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन , ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीइओ) ११ फेब्रुवारी रोजी दिला.

कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून गत एप्रिलपासून ग्रामसभांच्या आयोजनावर शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत स्थगिती देण्यात आली होती. दरम्यानच्या कालावधीत काही दिवसांसाठी ग्रामसभांवरील स्थगिती उठविण्यात आली होती. त्यानंतर ग्रामविकास विभागाच्या १५ जानेवारी रोजीच्या परिपत्रकानुसार ३१ मार्चपर्यंत राज्यातील ग्रामसभांच्या आयोजनावर स्थगिती देण्यात आली होती. परंतू ग्रामसभांच्या मंजुरीअभावी ग्रामपंचायतींचे वार्षिक विकास आराखडे, शासनाच्या विविध योजना, ग्रामपंचायती अंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्यांची यादी तयार करणे, पुनर्वसित गावांचे प्रस्ताव, गौण खनिज परवानगी, सरपंचविरोधातील अविश्वास प्रस्ताव , चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च इत्यादी बाबींचे कामकाज प्रलंबित राहिले आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असून, जनजीवन पूर्ववत होत आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामसभांच्या आयोजनावर ३१ मार्चपर्यंत देण्यात आलेली स्थगिती उठविण्यात येत असून, ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ आणि कोविड-१९ च्या अनुषंगाने निर्गमित मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अटीस अधीन राहून ग्रामसभांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात येत असल्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी ११ फेब्रुवारी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्राव्दारे दिला.

ग्रामसभांच्या मान्यतेअभावी

रखडलेली कामे लागणार मार्गी!

ग्रामसभांच्या आयोजनावर स्थगिती असल्याने, ग्रामसभांच्या मान्यतेअभावी गावागावांत विविध कामे रखडली होती. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार ग्रामसभांवरील स्थगिती उठविण्यात आली असल्याने आता ग्रामसभांच्या मान्यतेअभावी रखडलेली ग्रामीण भागातील विविध कामे मार्गी लागणार आहेत.