शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

८४ खेडी दुरुस्तीची माहिती देण्यास मजीप्राची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:39 IST

अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेचे पाणी शेवटच्या गावातील टाकीत पोहोचविण्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी २० लाख रुपये खर्च झाल्यानंतरही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेच नाही.

अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेचे पाणी शेवटच्या गावातील टाकीत पोहोचविण्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी २० लाख रुपये खर्च झाल्यानंतरही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेच नाही. काही दुरुस्ती थातूरमातूर, निकृष्ट साहित्याने झाल्याचा प्रकार घडला. त्याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीने मागविल्यानंतरही ती देण्यास महिनाभरापासून टाळाटाळ सुरू असल्याचा प्रकार घडत आहे.८४ खेडी योजनेत समाविष्ट गावांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरण्यास सातत्याने नकार दिला. त्याचा भार जिल्हा परिषदेवर पडत आहे. दरमहा १५ लाख २५ हजार रुपये या गावांना पाणी पुरवठ्यासाठी देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावे लागतात. ही समस्या पाहता प्रत्येक गावातील टाकीत पाणी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी २०१५ च्या टंचाईमध्ये योजनेतील गावांच्या टाकीत पाणी पोहोचण्यासाठी १० कोटी २० लाख रुपये निधी शासनाने दिला. तो निधी दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खर्च केला. त्यानंतर योजनेतील सर्वच गावांच्या टाकीत पाणी पोहोचून ते प्रत्येक प्रभागात जाणे क्रमप्राप्त होते; मात्र एवढी रक्कम खर्च करूनही २८ गावांतील टाक्यांमध्ये पाणी पोहोचले नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाण्यासाठी सातत्याने ओरड सुरू आहे. ही बाब ‘लोकमत’ने १४ आॅक्टोबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध केली. त्यावर १६ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत खडाजंगी झाली. सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांना माहिती मागविली; मात्र ती दिली नाही. आठवडाभरात ती देण्याचे सभेत सांगण्यात आले. त्यावर आता २५ दिवस उलटले, तरीही माहिती जिल्हा परिषदेला देण्यात आली नाही, हे विशेष.

दुरुस्तीचीही अनेक कामे अर्धवटगावांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या जलवाहिनीवरच नळ जोडणी केली. ही समस्या निकाली काढण्यासाठी गावातून जाणारी जलवाहिनी लोखंडी (डीआय) करणे आवश्यक होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १४४ किमी पीव्हीसी जलवाहिनीपैकी ५६ किमी बदलली.

अभियंत्यांच्या अहवालानंतरही कारवाईला बगलयोजनेतून झालेली कामे तरीही टाकीमध्ये पाणी न पोहोचलेल्या गावांची पडताळणी करण्यासाठी शाखा अभियंता ए. व्ही. देशमुख, आर. के. चौधरी यांनी संयुक्त पाहणी केली. त्यांच्या अहवालात २७ गावांतील टाक्यांमध्ये पाणी पोहोचत नसल्याचे उघड झाले. धनकवाडी, करतवाडी अ, सावरगाव, विटाळी, पुंडा, बांबर्डा, रोहणखेड, कावसा बु., कावसा खु., तरोडा, रेल, धारेल, दनोरी-पनोरी, दहीहांडा, वडद बु., केळीवेळी, जऊळखेड बु., ठोकबर्डी, पाटसुल, लामकानी, पळसोद, निजामपूर, देवर्डा, पारळा, किनखेड, पिलकवाडी, हनवाडी, नांदखेड, सांगवी, नेर, पिवंदळ खु. या गावांमध्ये टाकीत पाणी पोहोचण्यासाठी अनेक कामे झाली नसल्याचे अहवालात नमूद आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक