शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
2
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
3
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
4
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
5
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
6
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
7
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
8
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
9
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले
10
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
11
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
12
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
13
आयआयटी कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याला नग्न करून चप्पलांनी मारहाण; ३ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल, वॉर्डन निलंबित
14
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
15
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
16
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
17
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
18
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
19
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
20
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर

८४ खेडी दुरुस्तीची माहिती देण्यास मजीप्राची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 13:39 IST

अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेचे पाणी शेवटच्या गावातील टाकीत पोहोचविण्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी २० लाख रुपये खर्च झाल्यानंतरही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेच नाही.

अकोला: खारपाणपट्ट्यातील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ८४ खेडी योजनेचे पाणी शेवटच्या गावातील टाकीत पोहोचविण्याच्या दुरुस्तीसाठी १० कोटी २० लाख रुपये खर्च झाल्यानंतरही अनेक गावांमध्ये पाणी पोहोचलेच नाही. काही दुरुस्ती थातूरमातूर, निकृष्ट साहित्याने झाल्याचा प्रकार घडला. त्याबाबतची संपूर्ण माहिती जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीने मागविल्यानंतरही ती देण्यास महिनाभरापासून टाळाटाळ सुरू असल्याचा प्रकार घडत आहे.८४ खेडी योजनेत समाविष्ट गावांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी पाणीपट्टी भरण्यास सातत्याने नकार दिला. त्याचा भार जिल्हा परिषदेवर पडत आहे. दरमहा १५ लाख २५ हजार रुपये या गावांना पाणी पुरवठ्यासाठी देखभाल दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला द्यावे लागतात. ही समस्या पाहता प्रत्येक गावातील टाकीत पाणी पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी २०१५ च्या टंचाईमध्ये योजनेतील गावांच्या टाकीत पाणी पोहोचण्यासाठी १० कोटी २० लाख रुपये निधी शासनाने दिला. तो निधी दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खर्च केला. त्यानंतर योजनेतील सर्वच गावांच्या टाकीत पाणी पोहोचून ते प्रत्येक प्रभागात जाणे क्रमप्राप्त होते; मात्र एवढी रक्कम खर्च करूनही २८ गावांतील टाक्यांमध्ये पाणी पोहोचले नाही. त्यामुळे या गावांमध्ये पाण्यासाठी सातत्याने ओरड सुरू आहे. ही बाब ‘लोकमत’ने १४ आॅक्टोबर रोजीच्या अंकात प्रसिद्ध केली. त्यावर १६ आॅक्टोबर रोजी जिल्हा परिषदेच्या जल व्यवस्थापन समितीच्या सभेत खडाजंगी झाली. सदस्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांना माहिती मागविली; मात्र ती दिली नाही. आठवडाभरात ती देण्याचे सभेत सांगण्यात आले. त्यावर आता २५ दिवस उलटले, तरीही माहिती जिल्हा परिषदेला देण्यात आली नाही, हे विशेष.

दुरुस्तीचीही अनेक कामे अर्धवटगावांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांनी गावातून जाणाऱ्या जलवाहिनीवरच नळ जोडणी केली. ही समस्या निकाली काढण्यासाठी गावातून जाणारी जलवाहिनी लोखंडी (डीआय) करणे आवश्यक होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने १४४ किमी पीव्हीसी जलवाहिनीपैकी ५६ किमी बदलली.

अभियंत्यांच्या अहवालानंतरही कारवाईला बगलयोजनेतून झालेली कामे तरीही टाकीमध्ये पाणी न पोहोचलेल्या गावांची पडताळणी करण्यासाठी शाखा अभियंता ए. व्ही. देशमुख, आर. के. चौधरी यांनी संयुक्त पाहणी केली. त्यांच्या अहवालात २७ गावांतील टाक्यांमध्ये पाणी पोहोचत नसल्याचे उघड झाले. धनकवाडी, करतवाडी अ, सावरगाव, विटाळी, पुंडा, बांबर्डा, रोहणखेड, कावसा बु., कावसा खु., तरोडा, रेल, धारेल, दनोरी-पनोरी, दहीहांडा, वडद बु., केळीवेळी, जऊळखेड बु., ठोकबर्डी, पाटसुल, लामकानी, पळसोद, निजामपूर, देवर्डा, पारळा, किनखेड, पिलकवाडी, हनवाडी, नांदखेड, सांगवी, नेर, पिवंदळ खु. या गावांमध्ये टाकीत पाणी पोहोचण्यासाठी अनेक कामे झाली नसल्याचे अहवालात नमूद आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाwater transportजलवाहतूक