शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Vidhan Sabha 2019 : अकोट मतदारसंघात अस्थिर युतीने बदलताहेत समीकरणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 12:01 IST

भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी असा प्रमुख सामना रंगणार आहे.

विजय शिंदे

अकोट - अकोट मतदारसंघात सध्या अनेकांना आमदारकीचे डोहाळे लागले आहेत. विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या समोरील अडचणी कशा वाढविता येतील याचा प्रयत्न स्वपक्षासह विरोधकांनीही जोरकसपणे केल्यामुळे सध्या हा मतदारसंघ अकोल्यात सर्वाधिक चर्चेत आहे.

भाजप-शिवसेना युती, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी, वंचित बहुजन आघाडी असा प्रमुख सामना रंगणार आहे. मात्र युती व आघाडीने स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन स्वबळाची केलेली चाचपणी केली असली तरी आघाडीत बिघाडीचे चिन्हे नाहीत मात्र युती कधीही धोक्यात येऊ शकते असे संकेत आहेत. यामुळेच भाजप- शिवसेना उमेदवाराच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गेल्या आठवडयात भाजपचा कार्यकर्ता मेळावा झाला तर शिवसेना महिला मेळावा घेतला आहे. युती झाल्यास कोणते उमेदवार द्यावे आणि युती न झाल्यास कोणते उमेदवार द्यावे यावर नजर ठेवून काँग्रेस वंचित आघाडी यांनी सावध पवित्रा घेतलेला दिसत आहे.

अकोट-तेल्हारा विधानसभा मतदारसंघातून स्थानिक उमेदवाराचा मुद्दा ऐरणीवर आला असून, भाजपा पाठोपाठ शिवसेनेनेही हा सूर आळवला आहे. दूसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी वंचित आघाडी यांनीसुद्धा स्थानिक उमेदवारावर भर देण्याची रणनीती सुरू केली.गत निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर भाजपाने या ठिकाणी विजय मिळवला होता. काँग्रेस दुसऱ्या, भारिप-बमसं तिसऱ्या, तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिले होते. यावेळी युती होण्याचे संकेत मिळाल्याने पूर्वीप्रमाणे या मतदारसंघावर शिवसेना दावा करीत आहे. दोन्ही पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. तर यावेळी काँग्रेस राकाँ आघाडी होणार असल्यामुळे येथून या पक्षाची ताकत वाढणार आहे. दरम्यान, या मतदारसंघात बहुजन धर्मनिरपेक्ष अशा विचारधाराचे समीकरण बसविणारी वंचित बहुजन आघाडीचे मतदारसंघात सर्वाधिक जि.प. व पं.स. सदस्य तसेच अकोट व तेल्हारा पंचायत समिती एकहाती सत्ता नुकतीच संपुष्टात आल्याने काही प्रमाणात या पक्षाची यावेळी ताकत वाढण्याचे संकेत आहेत.

अकोट मतदारसंघाची ही स्थानिक राजकीय रणभूमी पाहता मतदारसंघात मराठा, कुणबी समाजाचे प्राबल्य आहे. शिवाय मुस्लीम, बौद्ध, माळी, बारी समाजाची गठ्ठा मते आहे. बारा बलुतेदार, हिंदी भाषिक मतदारासह अनेक छोट्या जातीसमूहाची मतेही निर्णायक आहेत. अशी सर्व मते ज्या उमेदवाराच्या पारड्यात पडतात, त्यांना निवडणूक जड जात नसल्याचे आजपर्यंतच्या निवडणूक निकालावरून स्पष्ट होते; परंतु आता स्थानिकचा मुद्दा पुढे आल्यामुळे कुणाचं घडतंय, कुणाचं बिघडतंय, हे लवकरच कळणार आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019vidhan sabhaविधानसभाakotअकोटAkolaअकोलाPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस