शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजचा व्यवसाय - एकनाथ डवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:45 IST

नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले.

अकोला: उत्पादन करणारे शेतकरी, खरेदी करणारेही शेतकरीच, त्यामुळे या दोघांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजला व्यावसायिक दृष्टिकोन ठरवावा लागतो. त्यासाठी नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले.कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या सदस्यांच्या आमसभेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी खासदार, महाबीजचे संचालक अ‍ॅड. खासदार संजय धोत्रे, संचालक वल्लभराव देशमुख, शेतकरी तज्ज्ञ संचालक अर्चना चोरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, भागधारक आमदार रणधीर सावरकर, अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष नागरे, कृषी विद्यापीठाचे डॉ. खर्चे, महाबीजचे पुंडकर उपस्थित होते.पुढे बोलताना डवले यांनी शासन निर्मित महाबीज ही संस्था बाजारातील स्पर्धेला तोंड देऊनही नफ्यात आहे. त्याचवेळी इतर संस्था तोट्यात आहेत. त्याचे कारण म्हणजे, महाबीजने सुरुवातीपासूनच अंगीकारलेला शेतकरी विकासाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे समाधान त्यांनी केले. त्यामध्ये गेल्या वर्षी बियाणे उत्पादकांना किमान आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरकाची रक्कम देण्याचा विचार निश्चित केला जाईल. बियाणे नमुने फेल होण्याच्या पद्धतीत सुधारणा केली जाईल. त्यासाठी नमूने घेण्याची पद्धत नव्याने ठरवली जाईल. उत्पादकांना मोबदला तातडीने मिळण्यासाठी व्यवस्थेत बदल करण्यासाठी संगणकीकरण करणे, आपत्तीमध्ये बियाणे उत्पादकांना भरपाई मिळण्यासाठी पीक विम्याच्या पर्यायाची तयारी ठेवणे, उत्पादकांना सर्वच प्रक्रियेबाबत मेसेंजिंग प्रणाली विकसित केली जाईल. महाबीजच्या प्रत्येक प्लँटवर सीसी कॅमेरे तातडीने लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी संचालक देशमुख यांनी शेतकºयांच्या मागण्या, अपेक्षांवर निर्णय घेण्याची मागणी केली. व्यवस्थापकीय संचालक भंडारी यांनी विविध मुद्यांवर माहिती दिली.

काळानुसार बदला- धोत्रेमहाबीजचा विक्रेता आणि ग्राहक एकच शेतकरी आहे. त्यामुळे महाबीजच्या सुरुवातीपासूनच यंत्रणा आणि शेतकºयांचे जिव्हाळ््याचे नाते होते. ते आता पूर्वीसारखे राहिले नाही. काळानुसार बदल झाला तरी माणूस म्हणून एकमेकांशी समन्वय हवा, अधिकारी-कर्मचाºयांनी तो आताही ठेवायलाच हवा. समस्या छोटी असतानाच दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होते, याकडे खासदार तथा संचालक अ‍ॅड. खासदार संजय धोत्रे यांनी लक्ष वेधले. 

 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे