शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजचा व्यवसाय - एकनाथ डवले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 13:45 IST

नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले.

अकोला: उत्पादन करणारे शेतकरी, खरेदी करणारेही शेतकरीच, त्यामुळे या दोघांचे हित जोपासण्यासाठीच महाबीजला व्यावसायिक दृष्टिकोन ठरवावा लागतो. त्यासाठी नफ्या-तोट्याच्या ताळेबंदाऐवजी सहकाराची भावना महत्त्वाची आहे. त्यासाठीच महाबीज कार्यरत आहे. पुढे जाण्यासाठीही हाच दृष्टिकोन ठेवावा लागणार आहे, असे महाबीजचे अध्यक्ष तथा राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी येथे सांगितले.कृषी विद्यापीठातील ठाकरे सभागृहात महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या सदस्यांच्या आमसभेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यावेळी खासदार, महाबीजचे संचालक अ‍ॅड. खासदार संजय धोत्रे, संचालक वल्लभराव देशमुख, शेतकरी तज्ज्ञ संचालक अर्चना चोरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी, भागधारक आमदार रणधीर सावरकर, अमरावती कृषी विभागाचे सहसंचालक सुभाष नागरे, कृषी विद्यापीठाचे डॉ. खर्चे, महाबीजचे पुंडकर उपस्थित होते.पुढे बोलताना डवले यांनी शासन निर्मित महाबीज ही संस्था बाजारातील स्पर्धेला तोंड देऊनही नफ्यात आहे. त्याचवेळी इतर संस्था तोट्यात आहेत. त्याचे कारण म्हणजे, महाबीजने सुरुवातीपासूनच अंगीकारलेला शेतकरी विकासाचा दृष्टिकोन महत्त्वाचा असल्याचे सांगितले. सभासदांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांचे समाधान त्यांनी केले. त्यामध्ये गेल्या वर्षी बियाणे उत्पादकांना किमान आधारभूत किंमत आणि बाजारभाव यातील फरकाची रक्कम देण्याचा विचार निश्चित केला जाईल. बियाणे नमुने फेल होण्याच्या पद्धतीत सुधारणा केली जाईल. त्यासाठी नमूने घेण्याची पद्धत नव्याने ठरवली जाईल. उत्पादकांना मोबदला तातडीने मिळण्यासाठी व्यवस्थेत बदल करण्यासाठी संगणकीकरण करणे, आपत्तीमध्ये बियाणे उत्पादकांना भरपाई मिळण्यासाठी पीक विम्याच्या पर्यायाची तयारी ठेवणे, उत्पादकांना सर्वच प्रक्रियेबाबत मेसेंजिंग प्रणाली विकसित केली जाईल. महाबीजच्या प्रत्येक प्लँटवर सीसी कॅमेरे तातडीने लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी संचालक देशमुख यांनी शेतकºयांच्या मागण्या, अपेक्षांवर निर्णय घेण्याची मागणी केली. व्यवस्थापकीय संचालक भंडारी यांनी विविध मुद्यांवर माहिती दिली.

काळानुसार बदला- धोत्रेमहाबीजचा विक्रेता आणि ग्राहक एकच शेतकरी आहे. त्यामुळे महाबीजच्या सुरुवातीपासूनच यंत्रणा आणि शेतकºयांचे जिव्हाळ््याचे नाते होते. ते आता पूर्वीसारखे राहिले नाही. काळानुसार बदल झाला तरी माणूस म्हणून एकमेकांशी समन्वय हवा, अधिकारी-कर्मचाºयांनी तो आताही ठेवायलाच हवा. समस्या छोटी असतानाच दुर्लक्ष केल्यास ती गंभीर होते, याकडे खासदार तथा संचालक अ‍ॅड. खासदार संजय धोत्रे यांनी लक्ष वेधले. 

 

टॅग्स :MahabeejमहाबीजAkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे