शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

‘प्लास्टिकमुक्त भारत’ अभियानाचा गवगवा; सत्ताधाऱ्यांचा कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 15:10 IST

मनपा प्रशासनालासुद्धा जनजागृतीसाठी मुहूर्त सापडत नसल्याने अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त २०१४ मध्ये ‘स्वच्छ भारत’अभियानाचा प्रारंभ केला होता. आता ‘प्लास्टिकमुक्त भारत’अभियानला प्रारंभ केला आहे. शहरात प्लास्टिक पिशव्या व इतर साहित्याची खुलेआम विक्री होत आहे. महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असताना या अभियानाचा केवळ गवगवा केला जात आहे. मनपा प्रशासनालासुद्धा जनजागृतीसाठी मुहूर्त सापडत नसल्याने अकोलेकर आश्चर्य व्यक्त करीत आहेत.तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान राबवून गाव हगणदरीमुक्तीसाठी व्यापक अभियान राबवले होते. त्याच धर्तीवर २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशात ‘स्वच्छ भारत’अभियान तसेच राज्य शासनाने ‘स्वच्छ महाराष्ट्र’अभियानाला सुरुवात केली. या मोहिमेत प्रथमच नागरी स्वराज्य संस्थांना उद्दिष्ट देऊन पहिल्या टप्प्यात वैयक्तिक शौचालयांची उभारणी करण्याचे निर्देश होते. त्यामुळे आपसूकच उघड्यावर शौचास बसणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले. ही मोहीम अद्यापही सुरू असून, आता कचºयाचे विलगीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. याकरिता राज्य शासनाकडून कोट्यवधींचा निधी दिला जात आहे. या अभियानानंतर पंतप्रधान मोदी यांनी ‘प्लास्टिकमुक्त भारत’चा नारा दिला आहे.यासंदर्भात नगर विकास विभागाकडून महापालिका प्रशासनाला निर्देश प्राप्त झाले असले तरीही मनपाच्या स्तरावर मागील महिनाभरापासून प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचे समोर आले आहे.भाजपचा कानाडोळा का?महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. पंतप्रधानांनी ‘प्लास्टिकमुक्त भारत’अभियानची घोषणा केल्यानंतर सत्तापक्ष भाजपने तडकाफडकी या विषयावर मनपा प्रशासनाची बैठक आयोजित करून दिशानिर्देश देणे अपेक्षित होते. मनपा प्रशासनाच्या नाकावर टिच्चून शहरात खुलेआम प्लास्टिक पिशव्यांची विक्री होत आहे. नागरिकांच्या हिताच्या सार्वजनिक विषयांकडेच भाजपचा नेहमी कानाडोळा का होतो, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

जनजागृतीसाठी विलंब!शहरातील सर्व्हिस लाइन, नाल्या-गटारे तसेच सार्वजनिक ठिकाणांवर प्लास्टिक पिशव्यांचा खच साचल्याचे दिसून येते. नागरिकांनी घराबाहेर निघताना साहित्य खरेदीसाठी कापडी पिशवीचा वापर करावा. तसेच विविध साहित्याची विक्री करणारे व्यावसायिक, फळ विके्रत्यांनी प्लास्टिक पिशव्यांचा वापर केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात अद्यापपर्यंतही मनपा प्रशासनाने जनजागृतीला प्रारंभ केला नसल्याचे चित्र आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाPlastic banप्लॅस्टिक बंदी