शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

शेतकरी जागर मंचच्या धर्तीवर सिन्हांचा ‘राष्ट्रमंच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 3:56 AM

शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्र सरकार विरोधात संघटितपणे आंदोलनाचा बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शेतकरी जागर मंचची कार्यप्रणाली व आंदोलनाला मिळालेले यश यामुळेच येत्या सोमवारी २९ जानेवारी रोजी दिल्ल्लीमध्ये ‘राष्ट्रमंच’ नावाचे स्वतंत्र विचार मंचची ते पायाभरणी करीत आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी अकोल्यातील कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

- राजेश शेगोकारअकोला : शेतकरी जागर मंचच्या माध्यमातून राज्यातील शेतक-यांच्या प्रश्नावर आक्रमक आंदोलन करणारे माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंतसिन्हा यांनी केंद्र सरकार विरोधात संघटितपणे आंदोलनाचा बिगुल फुंकण्याची तयारी केली आहे. शेतकरी जागर मंचची कार्यप्रणाली व आंदोलनाला मिळालेले यश यामुळेच येत्या सोमवारी २९ जानेवारी रोजी दिल्ल्लीमध्ये ‘राष्ट्रमंच’ नावाचे स्वतंत्र विचार मंचची ते पायाभरणी करीत आहेत. यामध्ये सहभागी होण्यासाठी अकोल्यातील कार्यकर्त्यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.यशवंत सिन्हा यांनी अकोल्यातील शेतकरी जागर मंचच्या व्यासपीठावर येत नोटबंदी, जीएसटी व कर्जमाफीसंदर्भात सरकारच्या विरोधात आसूड ओढले होते. या व्याख्यानादरम्यानच त्यांनी शेतकºयांच्या प्रश्नावर आंदोलन उभारण्याची घोषणा केलीहोती. त्यानुसार ३ डिसेंबर रोजी आयोजित कापूस-सोयाबीन-धान ‘कासोधा’ परिषदेत त्यांनी आंदोलन पुकारुन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या मांडला होता.या आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळाला होता. त्यामुळे सिन्हायांना नव्या लढाईचे बळ मिळाले. त्यातूनच शेतकरी जागर मंच आकाराला आला आहे.‘राष्टÑमंच’साठी यशवंत सिन्हा यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खा. राजू शेट्टी, युवा नेते रविकांत तुपकर, माजी खासदार नाना पटोले, आमदार आशिष देशमुख, शंकर अण्णा धोंडगे आदींसह अकोल्यातून शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे, जगदीश मुरुमकार, विजय देशमुख, कृष्णा अंधारे, रवी अरबट, डॉ.दीपक धोटे, मो.रेहान यांना आमंत्रित केले आहे.‘कासोधा’च्या आश्वासनांची पूर्ती नाहीशेतकरी जागर मंचने पुकारलेल्या ‘कासोधा’ आंदोलनाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या होत्या; मात्र आंदोलन होऊन दीड महिना संपला, तरी आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. याबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी शेतकरी जागर मंच पुन्हा आंदोलनाची तयारी करीत असल्याची माहिती शेतकरी जागर मंचचे प्रशांत गावंडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हाFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र