शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

कोल्हापुरी बंधाऱ्यांची वर्षभरापासून तपासणीच सुरू; समितीच्या केवळ दोन भेटी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 14:44 IST

अकोला : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चातून निर्माण झालेले कोल्हापुरी बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून घेण्यासाठी गठित केलेल्या समितीने वर्षभरात केवळ दोन भेटी दिल्या.

ठळक मुद्दे १०० हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधाºयांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली.बंधाºयांची तपासणी करण्यासाठी त्याची कुठलीच माहिती तीन महिन्यांपर्यंतही स्थानिक स्तरकडून देण्यात आली नाही.

अकोला : शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चातून निर्माण झालेले कोल्हापुरी बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करून घेण्यासाठी गठित केलेल्या समितीने वर्षभरात केवळ दोन भेटी दिल्या. त्यानंतर समितीचा दौराच झाला नाही. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्येच समितीकडे जबाबदारी देण्यात आली होती, हे विशेष. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभाग, पाटबंधारे विभाग (स्थानिक स्तर) च्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे.गेल्या काही वर्षांत १०० हेक्टरपेक्षा कमी सिंचन क्षमता असलेल्या कोल्हापुरी बंधाºयांची कामे जिल्हा परिषदेने लघू पाटबंधारे विभाग स्थानिक स्तरकडे दिली. त्या ८४ पैकी केवळ १४ बंधारे जिल्हा परिषदेला हस्तांतरित करण्यात आली. उर्वरित कामे हस्तांतरित करून घेण्यासाठी असे जिल्हा परिषदेने पाठपुरावा केला; मात्र त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त लावून धरले. त्यामुळे ८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या स्थायी आणि जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत त्यावर गंभीर चर्चा झाली. सभेतच मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण विधळे यांनी तीन सदस्यांची समिती बंधाºयांची सद्यस्थिती तपासण्यासाठी गठित करण्याचे सांगितले. त्यानंतर बंधाºयांची तपासणी करण्यासाठी त्याची कुठलीच माहिती तीन महिन्यांपर्यंतही स्थानिक स्तरकडून देण्यात आली नाही. त्यानंतर जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत ७२ बंधाºयांची जुजबी माहिती देण्यात आली. समितीचे सदस्य गोपाल कोल्हे यांनी बंधाºयाचे सुरुवातीचे अंदाजपत्रक, त्यामध्ये झालेली वाढ, वाढीव निधीतून केलेले काम, त्यातून किती सिंचन वाढले, शेतकºयांना कोणता लाभ झाला, या मुद्यांची माहिती २९ जानेवारीपर्यंत मागवली होती. त्या बैठकीतच १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान चौकशी समितीचा दौराही ठरवण्यात आला. समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य गोपाल कोल्हे यांच्यासह लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, स्थानिक स्तरच्या कार्यकारी अभियंत्यांचा समावेश आहे. समितीचे केवळ दोन दौरे झाले. त्यातून काहीच हातात पडले नाही. त्यामुळे याविषयी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी-अधिकारी कमालीचे उदासीन असल्याचेच चित्र पुढे आले आहे.  लघुपाटबंधारे विभागाची चालढकलजिल्हा परिषदेच्या बंधाºयांसाठी कोट्यवधी रुपये निधी घेतल्यानंतर ती कामे निर्दोष झाली नाहीत. त्याचा शेतकºयांनाही फायदा झालेला नाही. ही वस्तुस्थिती असल्यामुळे लघुपाटबंधारे विभाग स्थानिक स्तरचे अधिकारी बंधाºयांची संयुक्त पाहणी करण्यासाठी चालढकल करीत असल्याचा प्रकार गेल्या वर्षभरापासून घडत आहे.

पावसाळ््यातही अडले नाही पाणी!काही बंधाºयांमध्ये गेट टाकल्यास पाणी अडू शकते, त्यासाठीचे काही काम तातडीने करण्याची मागणी काही सदस्यांनी पावसाळ््यापूर्वीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत सातत्याने केली; मात्र लघुसिंचन विभाग, त्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांना त्याबाबत काहीच वाटत नसल्याने हा मुद्दा टांगतच ठेवण्यात आला आहे.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणDamधरणzpजिल्हा परिषद