शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
2
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
3
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
4
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
5
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
6
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
7
“प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यात भाजपाने पोसलेले डावे, जनसुरक्षा कायदा लावणार का?”: संजय राऊत
8
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
9
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
10
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
11
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
12
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
15
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
16
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
17
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
18
पाचव्या दिवशी लॉर्ड्सवर बाजी मारणं सोपं नाही, या तीन गोष्टी ठरणार भारतीय संघासाठी निर्णायक
19
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
20
चुकूनही अशा फंद्यात पडू नका; मुंबईतील बँक कर्मचाऱ्याने झटक्यात गमावले २.५९ लाख रुपये!

काेराेनाचा प्रभाव वाढला, शाळाबाह्य मुलांच्या शाेध माेहिमेला शिक्षकांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:19 IST

अकाेला शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोध मोहिमेद्वारे शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने १ मार्च ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांची ...

अकाेला शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शोध मोहिमेद्वारे शोधून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने १ मार्च ते १० मार्चपर्यंत शाळाबाह्य मुलांची शाेध माेहीम सुरू झाली आहे ही माेहीम काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने तूर्तास शाळाबाह्य मुलांची शाेध माेहीम स्थगित करण्यात यावी, अशी मागणी शिक्षक संघर्ष समितीने केली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियम २००९ अन्वये ६ ते १४ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम १० मार्चपर्यंत राबिवण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ०३ ते १८ वयोगटांमध्ये विद्यार्थी शिक्षण प्रवाहाच्या बाहेर असतील तर त्यांना या सर्वेक्षणामार्फत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या माेहिमेद्वारे प्रयत्न केले जातात. तीन ते सहा या वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध माेहीम अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मदतीने पार पाडण्यात येते तर ६ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक यामधील शिक्षकांच्या माध्यमातून सदर सर्वेक्षण पार पाडले जाते.

वाड्या, वस्त्या, घराेघरी जाऊन हे सर्वेक्षण करावे लागणार आहे. मात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शोध मोहीम स्थगित करावी व कोरोना आजाराचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर शोध मोहीम राबवावी, अशी मागणी शिक्षक संघटना संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.

शिक्षक संघटना म्हणतात

जिल्हा परिषदेतील उर्दू शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, दिव्यांग शिक्षक संघटना, शिक्षक परिषद प्राथमिक, शिक्षक आघाडी, प्रतिनिधी सभा, ॲक्शन फोर्स, आदिवासी विकास परिषद, केंद्र प्रमुख व पदवीधर शिक्षक संघटना, स्वाभिमान शिक्षक संघटनेच्या समितीने ही माेहीम काेराेनाचा प्रभाव ओसरेपर्यंत स्थगित करण्याची मागणी केल्याची माहिती संघर्ष समितीचे समन्वयक राजेश देशमुख यांनी दिली आहे.

दाेन वर्षांपूर्वी ३५० बालक हाेते शाळाबाह्य

दाेन वर्षांपूर्वी शाळाबाह्य सर्वेक्षण मोहीम राबिवण्यात आली हाेती. यावेळी शाळाबाह्य मुलांची संख्या ३५० हाेती. तसेच वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांची संख्या ३५ असल्याचे समाेर आले हाेते.