शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

सर्वच क्षेत्रात इनोव्हेशनला महत्व देण्याची गरज! -  डॉ. श्रीहरी मांडवगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 5:59 PM

प्रत्येकाने इनव्हेंशन आणि इनोव्हेशन दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. देशातील उद्योगक्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सद्या आॅटोमोबाईल्स क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञानाला महत्व आहे. इनोव्हेशनला महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने इनव्हेंशन आणि इनोव्हेशन दृष्टीकोनातून विचार करण्याची गरज आहे. देशातील उद्योगक्षेत्रात अनेक बदल घडून येत आहेत. नवनिर्मितीवर भर दिला जात आहे. असे टाटा मोटर्समधील हेड आॅफ कार्पोरेट क्वालिटी विभागाचे जनरल मॅनेजर डॉ. श्रीहरी पंढरीनाथ मांडवगणे यांनी शनिवारी सांगितले. आॅटोमोबाईल्स, कार्पोरेट क्षेत्राविषयी त्यांच्याशी साधलेला संवाद...

आपण कार्पोरेट क्षेत्राकडे कसे वळले?मांडवगणे : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अकोल्यात घेतल्यानंतर अमरावती बीई मॅकेनिकल गेले. एमई करीत असतानाच, टाटा मोटर्समध्ये सहायक व्यवस्थापकपदी रूजु झाला. हळूहळू एक-एक टप्पा पुढे जात, टाटा मोटर्सच्या हेड आॅफ कार्पोरेट क्वालिटीचे काम माझ्याकडे आले. या विभागात काम करताना, इनव्हेंशन आणि इनोव्हेशन कसे करायचे. याची माहिती मिळाली. हा विषय सर्वांसाठीच महत्वाचा आहे.

कार्पोरेट क्षेत्रातील मोठ्या कंपनीत काम कशाला चालना दिली जाते?मांडवगणे : टाटा मोटर्समध्ये काम करताना, अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. विशेष म्हणजे, जमशेदजी टाटा, जेआरडी टाटा, रतन टाटा यांची सकारात्मक विचारसरणी, त्यांनी जी दिशा दिली. ती प्रेरणादायी आहे. टाटांनी कधीच व्यावसायिक म्हणून काम केले नाही. येथे तंत्रज्ञान, व्यवस्थापनेला महत्व दिले जाते. व्यावसायिकतेसोबतच समाजाला आपण काय देऊ शकतो. याचा विचार अधिक होतो.

नॅनो टेक्नॉलॉजी का मागे पडली?मांडवगणे : यावर मी भाष्य करू शकत नाही. टाटा व इतर उद्योगपतींमध्ये खूप मोठा फरक आहे. ते व्यावसायिक म्हणून विचार करीत नाहीत. कोणतेही तंत्रज्ञान हे समाजाच्या भल्यासाठी असले पाहिजे. हा दृष्टीकोन महत्वाचा आहे. परंतु समाज काय करतो. यावर त्या तंत्रज्ञानाचे भवितव्य अवलंबून राहते. तंत्रज्ञान का मागे पडले. यापेक्षा नवनिर्मिती करण्यावर अमचा भर आहे.भविष्यातील कंपनीचे धोरण काय आहे?मांडवगणे : आॅटोमोबाईल्स क्षेत्रात इलेक्ट्रीक कार, सीएनजीचा वापर असणाऱ्या कार येणार आहेत. हे नवीन तंत्रज्ञान येऊ घातले आहे. त्याला केंद्र शासनाचे सुद्धा पाठबळ आहे. कार व ट्रक निर्मितीचे काम आमच्या कारखान्यात चालते. सध्या आॅटोमोबाईल्समध्ये मंदीचे वातावरण आहे. बेरोजगारी वाढत आहे. यावर मात करण्यासाठी इनोव्हेशनची गरज आहे. शिक्षणासोबतच गुणवत्ता आवश्यक आहे. गुणवत्ता, अनुभव असेल तर संधीला वाव आहे. तरूणांनी शिक्षणासोबतच गुणवत्तेकडे सुद्धा लक्ष दिले पाहिजे.

टॅग्स :interviewमुलाखतAkolaअकोलाTataटाटाAutomobile Industryवाहन उद्योग