शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

मूर्तिजापूर तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 6:20 PM

Agriculture News : सोयाबीन काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून असल्याने ते सडले आहे.

-संजय उमक मूर्तिजापूर : तालुक्यात परतीच्या पावसाने शनिवार दुपारपासूनच जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत होऊन बळीराजा संकटात पडला आहे.ऐन सोयाबीन काढणीच्या वेळी जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीन शेतात पडून असल्याने ते सडले आहे. या अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या नाकी नऊ आणले आहे.             दिवाळी सण तोंडावर असतांना निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचे दिवाळ निघाले आहे. वर्षभर  शेतात राब-राब राबून अथक परिश्रमाने पिकविलेले सोयाबीन, कपासी, तूर, मुग आदी पिकाचे परतीच्या पावसामुळे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहे. सोयाबीन व ज्वारी पिकाची काढणी सुरू असताना त्यावर धो-धो पाऊस आल्याने संपूर्ण पिके उध्वस्त झाली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तालुक्यात शनिवार पासून सतत पाऊस सुरू आहे. मध्यंतरी काही दिवस पावसाने सवड दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी, मका, कापूस, भूईमुग यांसारखी पिके काढणी सुरू असतांना पाण्याखाली गेली आहे. बहुतेक शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवरच अवलंबून आहे. मुर्तिजापूर तालुक्यातील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके पाण्याखाली गेली आहे. आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हा हिरावल्याचे चित्र आहे. सोयाबीन, कापसाच्या बोंड्या पावसामुळे सडल्या आहे. शासनाने नुकसान ग्रस्तांची त्वरित पाहणी करून कृषी विभागाच्या व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करावे व प्रशासनाच्या वतीने दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरagricultureशेती