शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या मदतीसाठी उपाययोजनांचे कवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 15:42 IST

अकोला: राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीत राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या मदतीसाठीविविध उपाययोजना राबविण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

अकोला: राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारशींच्या अंमलबजावणीत राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या मदतीसाठी शेतीचा सात-बारा नावावर करणे, विशेष वारसा हक्क नोंदणीद्वारे जमिनीचा हक्क मिळवून देण्यासह विविध उपाययोजना राबविण्याच्या निर्णयाला शासनामार्फत १८ जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना मदत करण्यासाठी आता शासनाच्या विविध विभागामार्फत उपाययोजनांचे कवच मिळणार आहे.राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील विधवांच्या समस्यांचे निवारण करून त्यांना न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोगाने केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी विविध विभागांमार्फत करण्याच्या निर्णयाला शासनामार्फत १८ जून रोजी मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना मदत करण्यासाठी विविध विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या उपाययोजना करण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्याकडून मान्यता, प्रत्यक्ष अंमलबजावणी, संनियंत्रण व निधी उपलब्धता यासंदर्भात सर्व प्रशासकीय कार्यवाही संबंधित विभागांना स्वतंत्रपणे करावी लागणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. विभागनिहाय अशा राबविण्यात येणार उपाययोजना !महसूल विभाग : शेतीचा सात-बारा आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांच्या नावावर करणे, चावडी वाचन कार्यक्रम तसेच विशेष वारसा हक्क नोंदणी शिबिरे घेऊन आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवांना जमिनीचा हक्क मिळवून देणे, शेतजमीन नावावर होत नसल्याने, विधवा महिलांना प्रधानमंत्री आवास योजनेत घरकुल मिळणे अवघड होत असल्याने, संबंधित विधवा महिलांच्या नावावर त्वरित शेतजमीन करून देणे.

महिला व बाल विकास विभाग : संपत्तीत वाटा मिळविताना आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या पत्नीस प्राधान्य देणे, मुलीचे लग्न जुळल्यास आर्थिक सहाय्य व सामूहिक विवाह पद्धत अवलंबणे, सरकार पातळीवर मदत मिळण्यासाठी होणारा त्रास थांबविण्यासाठी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला प्राधान्याने मदत करणे, महिलांच्या अधिकारासंदर्भात संबंधित विभागातील अधिकाºयांना प्रशिक्षण देणे व आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांचे प्रश्न संवेदनशिलतेने हाताळण्यासंदर्भात अधिकाºयांचे प्रबोधन करणे, जिल्हा पातळीवर विधवा महिलांसाठी विशेष सहाय्य कक्ष स्थापन करून सरकारी योजनांची माहिती, कायदेशीर मार्गदर्शन आणि अडचणींचा निपटारा करणे.

शिक्षण विभाग : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचे शिक्षण, त्याच्या शुल्क (फी) संबंधी अडचणी सोडविण्यासाठी विशेष धोरणाची अंमलबजावणी करणे.

सार्वजनिक आरोग्य विभाग : आजारपणात होणारी आर्थिक ओढाताण दूर करण्यासाठी उपाययोजना व आरोग्याच्या सोयी उपलब्ध करण्यासाठी हेल्थ कार्ड देणे.

रोजगार व स्वयंरोजगार विभाग : आत्महत्याग्रस्त शेतकºयाच्या मुलीचा संसार तुटलाच तर, तिच्या पालनपोषणाचा प्रश्न सोडविण्यास सहाय्य करणे.कृषी विभाग : किसान मित्र हेल्पलाइन सुरू करता येणे शक्य आहे का, यासंदर्भात अभ्यास करून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचा प्राधान्याने विचार करणे.

रोजगार हमी योजना विभाग : आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘मनरेगा’ योजना प्राधान्याने राबविणे व आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचा रोहयो कामामध्ये प्राधान्याने विचार करणे.

अन्न, नागरी पुरवठा विभाग : अन्न सुरक्षा योजनेचा लाभ प्राधान्याने देणे .

 

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या