शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तुटपुंज्या मदतीने दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या तोंडाला पुसली पाने

By admin | Updated: January 20, 2015 00:34 IST

एकरी खर्च १५ हजार; सरकारी मदत १८00 रुपये!

संतोष येलकर/अकोला : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू शेतीसाठी हेक्टरी ४५00 म्हणजेच एकरी केवळ १८00 रुपये मदत दिली जात आहे. पिकांसाठी एकरी १५ हजारांवर खर्च येत असताना, त्या तुलनेत सरकारकडून दिली जाणारी मदत अत्यंत तुटपुंजी असून मदतीच्या नावाखाली दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ११ डिसेंबर रोजी दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. त्यानुसार मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून जिल्हानिहाय निधीचे वितरणही करण्यात आले. ५ ऑगस्ट २0१४ च्या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानुसार अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिरायती (कोरडवाहू) शेतीसाठी हेक्टरी ४ हजार ५00 रुपये, बागायती शेतीसाठी हेक्टरी नऊ हजार रुपये आणि फळबागांसाठी हेक्टरी १२ हजार रुपये शेतकर्‍यांना मदत दिली जात आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोरडवाहू शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत हेक्टरी ४ हजार ५00 रुपये म्हणजेच एकरी १ हजार ८00 रुपये मदत दिली जात आहे. वास्तविक, शेतीच्या मशागतीपासून तर कापणी-मळणीपर्यंत खर्चच कमीत कमी एकरी १५ हजार रुपयांचा येतो. त्या तुलनेत सरकारकडून दिली जाणारी एकरी १८00 रुपयांची मदत अत्यंत तोकडी आहे. दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी येत्या पावसाळ्यापर्यंंत संसाराचा गाडा हाकण्यासाठी पुरेल एवढी नव्हे, तर किमान पिकांसाठी केलेल्या खर्चाची भरपाई करणारी मदत मिळावी, अशी शेतकर्‍यांना अपेक्षा आहे. शेतीची मशागत, पेरणी, कापणी व मळणीपर्यंंत पिकांसाठी एकरी १५ ते २0 हजार रुपयांचा शेतकर्‍यांना खर्च करावा लागतो. सरकारकडून कोरडवाहू शेतकर्‍यांना हेक्टरी ४५00 रुपये म्हणजेच एकरी १८00 रुपयांची मदत दिली जात आहे. पिकांसाठी एकरी लागणारा खर्च आणि त्या तुलनेत सरकारकडून मिळणारी मदत तुटपुंजी असल्याचे , भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मनोज तायडे यांनी स्पष्ट केले.