शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ग्रासरूट इनोव्हेटर : नव विकसित हळद कापणी उपकरण शेतकऱ्यांसाठी ठरत आहे वरदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 13:09 IST

हळद वाळविण्यासाठी त्याचे काप करणे आवश्यक असते.

- राजरत्न सिरसाट ( अकोला)

अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हळद कापणी उपकरण बनविले आहे. या उपकरणाने हळद काप अत्यंत सुलभ पद्धतीने होत असल्याने शेतकऱ्यांसाठी हे उपकरण वरदान ठरत आहे.

राज्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल हळद पिकाकडे मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, हळद शेतातून काढल्यानंतर त्यावर प्रक्रिया करणे अत्यंत अवघड काम आहे. हळद वाळविण्यासाठी त्याचे काप करणे आवश्यक आहे. मात्र, हे काम अत्यंत अडचणीचे ठरत असल्याने कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाने हळद काप उपकरण विकसित केले आहे. कापणी पश्चात अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागाचे डॉ. प्रदीप बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे उपकरण विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

हळद काप उपकरण एक अश्वशक्ती सिंगल फेज विद्युत मोटरवर चालते. एका तासात या यंत्राणे ३५० ते ४०० किलो हळदीचे काप करता येतात. हळद वाळविण्यासाठी काप करणे आवश्यक असल्याने या यंत्राद्वारे विविध जाडीचे काप तयार करता येतात.  नुसत्या हळदीचेच काप या यंत्राद्वारे केले जात नाही तर, बटाटे, अद्रक तसेच कांद्याचे काप तथा शेट्स करण्यासाठीसुद्धा या विकसित हळद काप यंत्राचा उपयोग करता येतो.

यंत्राची काप करण्याची क्षमता ८० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. विशेष म्हणजे हळद कापताना या उपकरणामुळे कसलेही नुकसान होत नाही. हे यंत्र हाताळण्यासाठी सुलभ असून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सोयीचे आहे. या यंत्रामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून, अनेक शेतकऱ्यांनी या यंत्राचा वापर सुरू केलेला आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी