शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

शेतकऱ्यांना हवी दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’! - किशोर तिवारी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 12:38 PM

अकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

 - संतोष येलकरअकोला : राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकºयांना दरमहा पाच हजार रुपये ‘पेन्शन’ दिली पाहिजे, यासंदर्भात दोन दिवसांत आपण राज्याच्या अर्थमंत्र्यांपुढे प्रस्ताव मांडणार आहे, अशी माहिती कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना दिली.देशातील शेतकºयांना दरमहा पेन्शन देण्याचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये केले होते; मात्र केंद्र सरकारकडून अद्याप शेतकºयांना पेन्शन लागू करण्यात आले नाही. त्यानुषंगाने राज्यातील अडचणीत सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने सर्व शेतकºयांना कोणतीही अट न लावता दरमहा पाच हजार रुपये पेन्शन लागू करून, दिलासा दिला पाहिजे. यासंदर्भात आपण दोन दिवसांत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडे शेतकºयांना पेन्शन लागू करण्याचा प्रस्ताव मांडणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी सांगितले.विनाअट लागवडीचे अनुदान द्यावे!सरकारने राज्यातील सर्व शेतकºयांना पीक लागवडीचे अनुदान दिले पाहिजे. गरीब-श्रीमंत असा भेद न करता तसेच जमीन क्षेत्राची कोणतीही अट न लावता सर्व शेतकºयांना विनाअट लागवडीचे अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे करणार असल्याचे किशोर तिवारी म्हणाले.बीपीएल-एपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्य द्या!राज्यातील सर्व बीपीएल शिधापत्रिकाधारकांना अंत्योदय योजनेंतर्गत आणि सर्व एपीएल शिधापत्रिकाधारकांना अन्नपूर्णा योजनेंतर्गत धान्याचा लाभ दिला पाहिजे, त्यासाठी सरकारकडे मागणी करणार असल्याचेही किशोर तिवारी यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारीFarmerशेतकरी