शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 1:57 PM

राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव ६ जानेवारी रोजी सादर केला.

- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांचा प्रस्ताव वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याकडे सादर केला आहे.गत महिन्यात राज्यात ३०० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. या पृष्ठभूमीवर वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्य सचिव अजोय मेहता यांची भेट घेऊन, राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या कार्यक्रमाचा प्रस्ताव ६ जानेवारी रोजी सादर केला.पतपुरवठा धोरण नियंत्रण, लागवडीचा खर्च व शेतीमालाचे भाव स्थिर ठेवण्यासाठी निधीचे व्यवस्थापन, जलसंपत्तीचे समान वाटप व जमिनीखालील जलसंपत्तीचे नियंत्रण, पीक पद्धतीचे नियोजन, सक्षम विपदा प्रबंधन प्रणालीचे संचालन व नियंत्रण, शेतीमाल संरक्षण व शेतीमाल साठवण प्रक्रिया व्यवस्थेचे नियोजन इत्यादी क्षेत्रात शेतकºयांचे भूअधिकार अबाधित ठेवून मूलभूत परिवर्तन करण्याची पद्धत आणि प्रशासकीय आराखड्यामध्ये सुधारणा करून एकात्मिक उपाययोजना करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री व मुख्य सचिवांकडे सादर करण्यात आला आहे.राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या या प्रस्तावासंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे.शेतकरी अधिकार आयोगाची स्थापना करा!मानवाधिकार आयोगाच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी अधिकार आयोगाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणीही वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सादर केलेल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकात्मिक उपाययोजनांच्या प्रस्तावात केली आहे.

टॅग्स :Akolaअकोलाfarmer suicideशेतकरी आत्महत्या