शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

कपाशीचा विमा काढण्यास शेतकऱ्यांचा कानाडोळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 14:06 IST

विमा काढल्यानंतर नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कपाशी पिकाचा विमा काढण्याकडे शेतकºयांनी कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविल्याची बाब समोर येत आहे.

अकोला : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप पिकांचा विमा काढण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. त्यानुसार राज्यात ९३ लाख शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला असून, त्यामध्ये सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक आहे. तर कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. विमा काढल्यानंतर नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कपाशी पिकाचा विमा काढण्याकडे शेतकºयांनी कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविल्याची बाब समोर येत आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांसह राज्यातील विविध जिल्ह्यात कपाशी पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या पृष्ठभूमीवर पीक विमा योजनेंतर्गत कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात असणे अपेक्षित असले तरी गेल्या काही वर्षात कपाशी पिकाचा विमा काढल्यानंतर पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने पीक विमा योजनेंतर्गत कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या कमी होत आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत यावर्षीच्या खरीप हंगामात खरीप पिकांचा विमा काढण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची मुदत ३१ जुलै रोजी संपली आहे. त्यानुसार ३१ जुलैपर्यंत राज्यातील ९३ लाख शेतकºयांनी खरीप पिकांचा विमा काढला असून, त्यामध्ये सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली. त्यानुसार पीक विमा योजनेत सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असली तरी, कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यानुषंगाने विमा काढल्यानंतर पीक नुकसान भरपाईचा लाभ मिळत नसल्याने, कापूस उत्पादक शेतकºयांनी पिकाचा विमा काढण्याकडे कानाडोळा करीत, सोयाबीन पिकाचा विमा काढण्याकडे कल वाढविला आहे.त्यामुळे पीक विमा योजनेत सोयाबीन पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना, कपाशी पिकाचा विमा काढणाºया शेतकºयांच्या संख्येत घट होत असल्याचे वास्तव समोर येत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrop Insuranceपीक विमाFarmerशेतकरी