शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी गावा-गावांत शेतकऱ्यांच्या बैठका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 11:22 AM

प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

- संतोष येलकरअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना टाळण्यासाठी अकोला जिल्ह्यात गावा-गावांमध्ये शेतकऱ्यांच्या बैठका घेऊन, फवारणी करताना काळजी घेण्यासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा अभिनव उपक्रम कृषी विभागामार्फत राबविण्यात येत आहे.सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने अकोला जिल्ह्यात कपाशी, सोयाबीन या पिकांवर मोठ्या प्रमाणात कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला असून, कीड व रोगांच्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी शेतकºयांकडून पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे; परंतु गत दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा होण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे कीटकनाशकांच्या फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना रोखण्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभाग, जिल्हा कृषी विभागामार्फत जिल्ह्यातील ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या जनजागृती बैठका घेण्यात येत आहेत. गत १५ दिवसांपासून गावा-गावांत शेतकºयांच्या बैठका घेऊन, कीटकनाशकाची फवारणी करताना व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकºयांच्या बैठकांमध्ये कृषी विभागाचे अधिकारी, कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षकांसह कीटकनाशके, बियाणे व खते कंपन्यांच्या संबंधित प्रतिनिधींकडून फवारणी करताना आणि फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकºयांना मार्गदर्शन करण्यात येत आहे.१४१ मोठ्या, ५८३ लहान गावांमध्ये बैठका!कीटकनाशक फवारणीसंदर्भात शेतकºयांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्ह्यातील १४१ मोठ्या आणि ५८३ लहान गावांत अशा एकूण ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या बैठका कृषी विभागामार्फत घेण्यात येत आहेत.असे केले जात आहे शेतकºयांचे प्रबोधन!शेतकºयांच्या बैठकांमध्ये कीटकनाशक फवारणीसंदर्भात प्रबोधन करण्यात येत आहे. त्यामध्ये फवारणी करताना व फवारणी केल्यानंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात ‘एलसीडी प्रोजेक्टर’द्वारे माहितीचे सादरीकरण शेतकरी व शेतमजुरांसमोर करण्यात येत आहे. तसेच सुरक्षा किट परिधान करून फवारणीचे प्रात्यक्षिकही शेतकरी-शेतमजुरांसमोर करण्यात येत आहे.कीटकनाशक फवारणीतून शेतकरी-शेतमजुरांना होणाºया विषबाधेच्या घटना नियंत्रणासाठी जिल्ह्यातील ७२४ गावांमध्ये शेतकºयांच्या बैठका घेऊन जागृती करण्यात येत आहे. या बैठकांमधून फवारणी करताना व फवारणीनंतर घ्यावयाची काळजी, यासंदर्भात शेतकरी-शेतमजुरांचे प्रबोधन करण्यात येत आहे.-डॉ. मुरली इंगळे,कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी