शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

शेतकरी संकटात; विनाअट हवी मदत - किशोर तिवारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 12:50 PM

शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.

- संतोष येलकर

अकोला: सतत सुरू असलेल्या परतीच्या पावसाने विदर्भ आणि मराठवाड्यात २० लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी व भात पिकाचे नुकसान झाल्याने, शेतकरी संकटात सापडला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे, अशी मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.पावसाळा संपल्यानंतर गत २० आॅक्टोबरपासून परतीचा पाऊस सतत बरसत आहे. सतत बरसणाºया परतीच्या पावसाने, कापणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन, ज्वारी, भात या पिकांसह कापूस पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे भिजलेले सोयाबीन व ज्वारीचे पीक सडले असून, कोंब फुटले आहेत. वेचणीला आलेला कापूस भिजला असून, कपाशीच्या बोंड्या सडल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांत आणि मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत अशा एकूण २५ जिल्ह्यांत २० लाख हेक्टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने, हाता-तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविला आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकºयांना दिलासा देण्यासाठी शासनाने कोणतीही अट न लावता विनाअट पीक नुकसान भरपाईची मदत दिली पाहिजे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.पीक नुकसानाचे अर्ज सादर करण्यासाठी शेतकºयांची धावपळ!पीक विमा काढलेल्या शेतकºयांनी पीक नुकसानाची माहिती संबंधित पीक विमा कंपनीकडे देणे आवश्यक आहे; मात्र तालुकास्तरावर विमा कंपनीचे अधिकारीच उपलब्ध नाहीत, त्यामुळे पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये सादर करण्यासाठी शेतकºयांना धावपळ करावी लागत आहे. पीक नुकसानाच्या माहितीचे अर्ज सादर करण्याची मुदत शासनाने वाढवून दिली पाहिजे, अशी मागणीही किशोर तिवारी यांनी केली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाKishor Tiwariकिशोर तिवारी