शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

पावसाळा सुरू झाल्यावरही पाणीटंचाई निवारणाची ४७३ कामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 10:23 AM

जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात प्रस्तावित ४९१ गावांमध्ये ५८६ उपाययोजनांच्या कामांपैकी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यातील १३५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ११३ कामे पूर्ण करण्यात आली आहेत. पावसाळा सुरू झाल्याच्या पृष्ठभूमीवर पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असून, जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या कृती आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. पाणीटंचाई कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४९१ गावांमध्ये ५८६ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली होती. कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १३५ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ११३ कामे पूर्ण करण्यात आली. पावसाळा सुरू झाला असून, पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत ३० जून रोजी संपली असताना, कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ३५६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४७३ कामे अद्याप प्रलंबित आहे. पाणीटंचाई निवारणाची कामे करण्याची मुदत संपल्याच्या पृष्ठभूमीवर कृती आराखड्यातील प्रस्तावित पाणीटंचाई निवारणाची कामे आता पूर्ण होण्याची शक्यता नाही.३.३५ कोटींचे अनुदान प्रलंबित!पाणीटंचाई निवारणासाठी ११३ उपाययोजनांच्या देयकांपोटी ३ कोटी ३५ लाख ७ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून प्राप्त होणे अध्याप प्रलंबित आहे.

टॅग्स :Akolaअकोलाwater scarcityपाणी टंचाई