शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वृक्षसंवर्धनासाठी झाडांसोबत भावनिक नाते गरजेचे! -  ए. एस. नाथन 

By atul.jaiswal | Updated: July 13, 2019 17:46 IST

वलेल्या प्रत्येक झाडासोबत भावनिक नाते-सबंध जोडले, तरच ते झाड जगण्याची शक्यता अधिक असते आणि यामाध्यमातूनच वृक्षसंवर्धन मोहिमा यशस्वी होऊ शकतात.

- अतुल जयस्वाल

अकोला : पर्यावरणाचा ढासळता समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे लावण्याची गरज असून, लावलेल्या प्रत्येक झाडासोबत भावनिक नाते-सबंध जोडले, तरच ते झाड जगण्याची शक्यता अधिक असते आणि यामाध्यमातूनच वृक्षसंवर्धन मोहिमा यशस्वी होऊ शकतात, असे मत भारत वृक्ष क्रांती मोहिमेचे संस्थापक ए. एस. नाथन यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. मुळचे तामिळनाडू राज्यातील व गत पाच वर्षांपासून अकोल्यात राहून राज्यभर वृक्षसंवर्धनासाठी झटत असलेल्या ए. एस. नाथन यांच्याशी साधलेला संवाद....प्र. वृक्षसंवर्धन मोहिमेकडे कसे व कधी वळलात ?नाथन : बेसुमार जंगलतोडीमुळे पर्यावरचा ºहास होत आहे. वृक्षतोड मानवाच्या मुळावर उठत आहे. झाडे जगली तरच मानवाचे अस्तित्व टिकेल असा विचार मनात आला. तसेच झाडांची सेवा ही इश्वराची सेवा करण्यासारखे असल्याचे माझे ठाम मत आहे. यातूनच वर्ष २०११ मध्ये वृक्षसंवर्धनासाठी काम करण्यास सुरुवात केली. यासाठी राज्यभर फिरून संशोधन केल्यानंतर भारत वृक्ष क्रांती संघटनेची स्थापना केली.प्र. वृक्षसंवर्धनासाठी अकोला जिल्ह्याची निवड कशी केली?नाथन : रोजगाराच्या शोधार्थ २००७ मध्ये मुंबई येथे आलो व तेथे चित्रपटसृष्टीत मिळेल ते काम केले. त्यानंतर वृक्षसंवर्धनासाठीच्या एका उपक्रमाबाबत मंत्रालयात गेलो असता तेथे परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांची भेट झाली व त्यांनी अकोल्यात येण्याची गळ घातली. तेव्हापासून अकोल्यात वृक्षसंवर्धनाचे प्रयोग राबवित आहे.प्र. आतापर्यंत कोण-कोणते उपक्रम राबविले?नाथन : महाराष्ट्रात वृक्षसंवर्धनाची सुरुवात ‘एक दाखला-एक झाड’ या उपक्रमाने केली. यानंतर ‘एक विवाह-एक झाड’हा उपक्रमही लागू करावा, यासाठी प्रयत्न केले. ‘एक जन्म - एक झाड’ व ‘एक विद्यार्थी - एक झाड’ हे दोन उपक्रम अकोला पॅटर्न म्हणून राज्यभरात लागू करण्यात यशस्वी होऊ शकलो. ‘एक जन्म - एक झाड’ या उपक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाच्या सहकार्याने हजारो झाडे लावण्यात आली आहेत.प्र. सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेबद्दल काय सांगाल ?नाथन : शासनाच्यावतीने राबविण्यात येणारी वृक्षारोपण मोहिम स्तुत्यच आहे. या मोहिमेअंतर्गत लावण्यात येणाऱ्या झाडांसोबत मानसांची भावनिक सांगड घालण्याची गरज आहे. मानवी वस्त्यांमध्ये मनुष्याला उपयोगी अशा झाडांचे रोपण केल्यास ती झाडे जगण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे गावांमध्ये आंबा, चिंच, बेल यासारखी फळझाडे लावणे गरजेचे आहे. जंगलांमध्ये वड, पिंपळ यासारखी मोठी झाडे लावणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :interviewमुलाखतAkolaअकोलाenvironmentपर्यावरण