शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

सात बार्‍याच्या फेरफार नोंदीमुळे कॅनॉल रस्त्याला ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 01:08 IST

जुने शहरातील कॅनॉल रस्त्याचे काम तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी केलेल्या प्रतापामुळे रखडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतकर्‍यांकडून कॅनॉलसाठी जमीन भूसंपादित केल्यानंतर सात-बार्‍याच्या फेरफार नोंदी करताना सात-बार्‍यावर ही जमीन शासनाच्या मालकीची करणे क्रमप्राप्त होते. तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी तशा नोंदीच न केल्यामुळे आजही सदर जमीन शेतकरी व काही मालमत्ताधारकांच्या नावाने कायम असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देतत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांचा प्रतापकॅनॉल रस्त्याचा तिढा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जुने शहरातील कॅनॉल रस्त्याचे काम तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी केलेल्या प्रतापामुळे रखडल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. शेतकर्‍यांकडून कॅनॉलसाठी जमीन भूसंपादित केल्यानंतर सात-बार्‍याच्या फेरफार नोंदी करताना सात-बार्‍यावर ही जमीन शासनाच्या मालकीची करणे क्रमप्राप्त होते. तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांनी तशा नोंदीच न केल्यामुळे आजही सदर जमीन शेतकरी व काही मालमत्ताधारकांच्या नावाने कायम असल्याची माहिती आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय कोणता निर्णय घेतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे. जुने शहरातील डाबकी रोड, किल्ला चौक ते जुना बाळापूर नाका आदी प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा ताण वाढला आहे. त्यामुळे या भागातील वाहतुकीसाठी पर्यायी रस्त्यांचे निर्माण होणे अत्यावश्यक झाले आहे. प्रशस्त रस्त्यासाठी डाबकी रोड ते जुना बाळापूर नाक्यापर्यंतच्या कॅनॉल रोडचा पर्याय उपलब्ध असताना महापालिकेची यंत्रणा जिल्हा प्रशासनासमोर हतबल ठरत असल्याचे दिसून येते. डाबकी रोड ते जुना बाळापूर रोड ते राष्ट्रीय महामार्गालगतच्या नवीन किराणा मार्केटपर्यंत प्रशस्त रस्ता तयार करण्यासाठी मनपा प्रशासनाने पुढाकार घेतला होता. २0१२ मध्ये तत्कालीन आयुक्त दीपक चौधरी यांनी डाबकी रोड ते जुना बाळापूर रोडपर्यंत १ हजार ३00 मीटर लांब रस्त्यासाठी निविदा प्रकाशित केली होती. त्याकरिता १ कोटी ६0 लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. यादरम्यान, पाटबंधारे विभागाने ही जमीन देण्यास टाळाटाळ केल्यामुळे महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली. तत्कालीन जिल्हाधिकारी जी.श्रीकांत, तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी जागेची पाहणी केली होती. जिल्हाधिकार्‍यांनी तहसील कार्यालयातून प्राप्त जमिनीच्या दस्तावेजांची पाहणी केली असता तत्कालीन मंडळ अधिकारी व तलाठय़ांनी कॅनॉलसाठी भूसंपादित के लेल्या जमिनीची शासनदरबारी नोंदच केली नसल्याचा प्रकार समोर आला होता. सात-बार्‍यावर फेरफार नोंदी न केल्यामुळे नजरचुकीने म्हणा किंवा कामचुकारपणामुळे कॅनॉलची जागा संबंधित मूळ शेतकरी व काही मालमत्ताधारकांच्या नावावर कायम असल्याचे चित्र आहे. 

कारवाई का नाही?तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांच्या प्रतापामुळे सिंचनासाठी भूसंपादित केलेली जमीन शेतकर्‍यांच्या नावावर कायम राहिली. हा गंभीर प्रकार पाहता जिल्हा प्रशासनाने तत्कालीन मंडळ अधिकारी, तलाठय़ांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मागील अनेक दिवसांपासून हा तिढा कायम असताना संबंधितांवर कारवाई का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :Akola Old cityअकोला जुने शहरroad safetyरस्ते सुरक्षा