शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

प्रभावी अंमलबजावणीअभावी राज्यात १९ लाख नागरिक घरकुलाच्या प्रतीक्षेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 13:15 IST

देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातदेखील वर्षभराआधी नोंदणी झाली; मात्र प्रभावी अंमलबजावणीअभावी राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांवर घरकुलाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देप्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने राज्य शासनाने शक्तीप्रदत्त समितीची स्थापना केली. मात्र शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकाच झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांचे घराचे स्वप्न तूर्त भंगले आहे.

- संजय खांडेकरअकोला : सर्वसामान्य माणसाला स्वत:च्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशभरात नोंदणी केली. देशातील विविध राज्यांसह महाराष्ट्रातदेखील वर्षभराआधी नोंदणी झाली; मात्र प्रभावी अंमलबजावणीअभावी राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांवर घरकुलाच्या प्रतीक्षेत राहण्याची वेळ आली आहे.प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने निर्गमित केलेल्या प्रतिकृतींची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली. निविदा प्रक्रिया राबविणे, खासगी विकासकांची निवड करणे, जमिनींची निवड करणे आदींसाठी स्थानिक कार्यक्षेत्रनिहाय जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाचे उपसचिव रा. कों. धनावडे यांच्या स्वाक्षरीने परिपत्रक काढले गेले आहे. प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने राज्य शासनाने शक्तीप्रदत्त समितीची स्थापना केली. ही समिती आंतरविभागीय मुद्दे ठरावीक कालावधीत बैठका घेऊन सर्वसंमतीने निकाली काढेल. सोबतच गृहनिर्माण धोरणाशी संबंधित योजनेला गती देतील, ही अपेक्षा होती; मात्र शक्तीप्रदत्त समितीच्या बैठकाच झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील १९ लाख ४० हजार नागरिकांचे घराचे स्वप्न तूर्त भंगले आहे.*जिल्हानिहाय घरकुलाच्या प्रतीक्षेतील नागरिकनंदुरबार १०५०३, धुळे २१८२३, जळगाव ५१२७७, बुलडाणा २०९६९, अकोला २७५५२, वाशिम ८०७९, अमरावती ३९५६९, वर्धा १६०६४, नागपूर १२१३०६, भंडारा ८९२२, गोदिंया ८६१५, गडचिरोली ४५०१, चंद्रपूर २९३८३, हिंगोली ६८२७, परभणी २१७५१, जालना १४३९८, औरंगाबाद ६१७०३, नाशिक ९९१६८, ठाणे ३१९२९४, पालघर ५२५५, संपूर्ण मुंबई ४७६२८१, रायगड ३७१३०, पुणे २१९०७५, अहमदनगर ३४८५०, बीड १९६४५, लातूर २३८७३, उस्मानाबाद १०७४८, सोलापूर ५३३७६, सातारा २१७६५, रत्नागिरी १००६२, सिंधुदुर्ग ४०४८, कोल्हापूर ४६९४३, सांगली २७४५९.-प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत प्रदेश विकास प्राधिकरण, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायततर्फे घरकुलांची नोंदणी १९ लाखांच्यावर जात आहे; मात्र नियमावलीनुसार जोपर्यंत टप्पेवारी रक्कम उपरोक्त यंत्रणेकडून येत नाही, तोपर्यंत म्हाडाच्या प्रत्यक्ष कामाला गती मिळू शकत नाही.- जयसिंग राजपूत, कार्यकारी अभियंता, म्हाडा अमरावती विभाग.-शासनाच्या योजना चांगल्या आहेत; मात्र अंमलबजावणीसाठी जी सक्षम यंत्रणा पाहिजे, ती कार्यरत नाही. अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे घरकुलाची योजना प्रत्यक्षात अस्तित्वात येण्यास उशीर होत आहे.-पंकज कोठारी, समन्वयक हाउसिंग कमिटी राष्ट्रीय क्रेडाई, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना