शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

बाळापूर तालुक्यावर दुष्काळाचे सावट!

By admin | Updated: July 17, 2017 02:59 IST

तिबार पेरणीचे संकट कायम, शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : बाळापूर तालुक्यात सध्या अधूनमधून रिमझिम रिमझिम पाऊस पडत असला, तरी अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. रिमझिम पावसाने पिकाची स्थिती सध्या बरी वाटत असली, तरी गुरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होणार असून, कोरडवाहू शेतकरी संकटात असल्याने तालुक्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट दिसत आहे.तालुक्यात काही भागात निंदन, डवरणी, फवारणीची कामे सुरू आहेत. दमदार पाऊस झाला नसल्याने १५ जुलैपर्यंत १४० मि.मी. पाऊस झाला. १५ जुलै २०१६ रोजी ३०६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या आकडेवारीवरून गेल्या वर्षीपेक्षा निम्मा पाऊसही अद्यापपर्यंत झाला नसल्याचे दिसत आहे. सध्या पेरणीला एक महिन्याहून अधिक कालावधी झाला असून, पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. शेतकरी, शेतमजुरांना कामे नसल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तालुक्यातील ९० टक्क्यापेक्षा जास्त शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, मागील वर्षापासून सातत्याने पावसाचे प्रमाण घटत आहे. पावसाच्या लहरीपणाचा फटका दरवर्षीच शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. जून, जुलै महिन्यात राखून नियोजन केलेला गुरांचा चारा संपुष्टात आल्याने पावसाळ्यात गुरांना वैरणाची व विहिरी, बोअरवेल्सना पाण्याची टंचाई जाणवत आहे. तालुक्यात सिंचित क्षेत्र नसल्याने ९५ टक्के शेती निसर्गावर अवलंबून आहे. तालुक्यातील सात सर्कलमध्ये सर्वात जास्त पाऊस वाडेगाव सर्कलमध्ये १८५ मि.मी., बाळापूर १७५ मि.मी., व्याळा १३८ मि.मी., पारस १३७ मि.मी., उरळ ९७ मि.मी., निंबा १७५ मि.मी., हातरुण ६५ मि.मी. पावसाची नोंद आहे. तालुक्यातच सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस नसल्याने सातही महसूल सर्कलमध्ये पावसाचे आकडे वेगवेगळे आहेत. आगर परिसरात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या!- परिसरात ढगाळ वातावरण असले, तरी पावसाची एकही सर कोसळत नसल्याने पाऊस फक्त खो देत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसाअभावी खरीप हंगामातील बहुतांश शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.परिसरातील शेतकऱ्यांना मागीलवर्षी शेतीमध्ये बऱ्यापैकी उत्पन्न झाल्याने चालू वर्षासाठी जानेवारी २०१७ पासूनच शेतीची मशागत करून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बी-बियाण्याची खरेदी करून ठेवली. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या चांगल्या पावसाच्या अंदाजामुळे मृग नक्षत्रातच तिफण बाहेर काढून ८ ते १२ जून रोजी पडलेल्या समाधानकारक पावसानंतर अनेक शेतकऱ्यांनी कपाशीसह मूग, उडीद, सोयाबीन पिकाची पेरणी केली. - या दरम्यान काही टक्के पेरण्या होताच पावसाने दडी मारली. पुन्हा ८ जुलै रोजी तुरळक पाऊस पडला. पेरण्या झालेल्या काही श्ोतातील ६० टक्केहून अधिक बियाणे अद्याप उगवले नाही. मागील चार दिवसांपासून ढगाळी वातावरण असूनसुद्धा पाऊस पडत नाही. यामुळे शेतकरी पुरता खचला असून, दुबार पेरणीचे संकट ओढवणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांचे पीक पेऱ्यांचे नियोजन बदलले असून, घरात आणून ठेवलेल्या बियाण्याचे करावे तरी काय, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. अद्यापपर्यंत २० टक्के पेरण्या थांबल्या असल्याने शेतकरी पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून येत आहे.