शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
2
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
3
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
4
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
5
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
6
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
7
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
8
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
9
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
10
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
11
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
12
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
13
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
14
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
15
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
16
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
17
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
18
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
19
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
20
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट

ऐन दिवाळीच्या तोंडावर व-हाडात ११ शेतकरी आत्महत्या !

By admin | Published: November 10, 2015 8:30 PM

तीन वर्षांपासून दुष्काळ; दिवाळीला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या घरात मात्र अंधार.

विवेक चांदूरकर /वाशिम:तीन वर्षांपासूनचा दुष्काळ आणि शेतमालाला मिळणारे अल्प भाव यामुळे संकटात सापडलेल्या वर्‍हाडातील अकरा शेतकर्‍यांनी हर्षोउल्हासाचा समजल्या जाणार्‍या दिवाळी सणाच्या तोंडावर मृत्यूला कवटाळले. प्रकाशाचा सण असलेल्या दिवाळीला या शेतकरी कुटुंबांच्या घरात मात्र अंधार आहे. या सर्व आत्महत्या एक ते नऊ नोव्हेंबरदरम्यान झाल्या. वर्‍हाडात गत तीन वर्षांपासून दुष्काळ असून, शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती पार कोलमडली आहे. सण, उत्सव साजरे करणे तर दूरच त्यांना दोन वेळच्या जेवणाची चिंता सतावत असल्याचे विदारक चित्र आहे. घरी शेती असल्यामुळे दारिद्रय़ रेषेसह अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही आणि शेतीतून एक पैसाही उत्पादन होत नाही. निसर्ग सतत धोका देत असल्याने बळीराजा खचून गेला आहे. दिवाळी सणाच्या पृष्ठभूमिवर आपल्या घरातील दारिद्रय़ाचा अंधार, मुलाबाळांचे फाटलेले कपडे, कुटंबाच्या गरजाही आपण पूर्ण शकत नसल्याचे शल्य त्याला बोचत आहे. हे दु:ख सहन न झाल्यानेच गत आठवड्यात वाशिम, अकोला जिल्ह्यात प्रत्येकी पाच तर बुलडाणा जिल्ह्यातील एका शेतकर्‍याने या जगातून कायमचा निरोप घेतला.

*यांनी संपविले जीवन..

१) गणेश दुकळे, चिखली, जि. बुलडाणा,२) प्रल्हाद नामदेव गायकवाड (वय ६0) मंगरुळपीर, जि. वाशिम.३) बंडू गोदमले, ढोणी, ता. मानोरा, जि. वाशिम,४) श्रीराम गोविंदराव खिराडे (६0) धनज बु. ता. कारंजा, जि. वाशिम. ५) नामदेव बल्लाळ, गोस्ता, ता. मानोरा, जि. वाशिम.६) अरविंद खडसे मेंद्रा ता. मानोरा, जि. वाशिम ७) संदीप कावरे, भटोरी, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला.८) शंकर राजाराम कुरवाडे, हिवरा बोर्डे, जि. अकोला.९) रोहणा येथील मुळे, १0) निंबा येथील एका शेतकर्‍याचा समावेश आहे. ११)गंगुबाई प्रल्हाद वायकर तेल्हारा,जि.अकोला.