शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
3
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
4
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
5
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
6
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
7
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
8
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
9
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
10
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
11
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
12
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
13
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
14
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
15
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
16
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
17
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
18
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
19
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
20
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले

अवकाळीमुळे ८०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 11:13 AM

Akola News : उन्हाळी पिकांसह कांदा, फळबाग, निंबू बागांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देअकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसान८१ गावांतील पिके प्रभावित

अकाेला : खरीप हंगाम काही दिवसांवर आहे; परंतु त्याआधीच अवकाळी पावसाचा तडाखा जिल्ह्यात बसू लागला आहे. तौक्ते वादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहे. जिल्ह्यात रविवारी अवकाळी पावसामुळे ८०५ हेक्टर क्षेत्रावरील पिकांची हानी झाली असून, ८२ गावांना वादळाचा फटका बसला. याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला आहे.

कोरोनामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यात भर उन्हाळ्यात वारंवार अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने उन्हाळी पिकेही हातची जात आहे. अरबी समुद्रातील तौक्ते वादळामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्याला फटका बसला आहे. रविवारी या चक्रीवादळाचा परिणाम जिल्ह्यात दिसून आला. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण हाेते; मात्र सायंकाळी जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या सरी काेसळल्या. ग्रामीण भागात या पावसाचा जास्त जोर दिसून आला. त्यामुळे उन्हाळी पिकांसह कांदा, फळबाग, निंबू बागांचे नुकसान झाले. अकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाल्याची नोंद झाली आहे.

 

येथे झाले नुकसान

अकाेट तालुक्यात केळी, संत्रा, कांदा, लिंबू या ७९९ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. मूर्तिजापूर तालुक्यात केळीचे १.६० हेक्टर क्षेत्रात, बार्शिटाकळी तालुक्यात पपई, लिंबू ४.४० हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले.

टॅग्स :AkolaअकोलाRainपाऊसTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ