जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:17 AM2021-04-14T04:17:31+5:302021-04-14T04:17:31+5:30

काेराेना विषाणूचा वेगाने हाेणारा प्रसार लक्षात घेता २४ मार्च २०२० राेजी केंद्र शासनाने काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून लाॅकडाऊन ...

Crowds of citizens rush to buy necessities | जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची उसळली गर्दी

Next

काेराेना विषाणूचा वेगाने हाेणारा प्रसार लक्षात घेता २४ मार्च २०२० राेजी केंद्र शासनाने काेराेनाची साखळी खंडित करण्याच्या उद्देशातून लाॅकडाऊन लागू केले हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी अचानक लाॅकडाऊनची घाेषणा केल्यामुळे हातावर पाेट असणाऱ्या मजूर वर्गाची गावाकडे परत जाण्यासाठी एकच धांदल उडाली हाेती. दरम्यान, राज्यात काेराेनाचा प्रभाव ओसरत असल्याचे पाहून शासनाने १ जूनपासून टप्प्याटप्प्याने ‘अनलाॅक’ला सुरुवात केली हाेती. काेराेना संपण्याची चिन्हं दिसत असतानाच जानेवारी महिन्यापासून पुन्हा एकदा काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समाेर आले आहे. वर्तमानस्थिती लक्षात घेता राज्यात काेराेनाची माेठी लाट आली असून, शासकीय वैद्यकीय यंत्रणा असाे वा खासगी रुग्णालयांमध्ये काेराेनाबाधित रुग्णांसाठी खाटांची कमतरता निर्माण झाली आहे. व्हेंटिलेटर बेड, ऑक्सिजन व अत्यावश्यक औषधींचा तुटवडा निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. काेराेनाच्या वाढत्या प्रसाराला नागरिकांचा गाफीलपणा कारणीभूत ठरला आहे. या परिस्थितीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने मध्यंतरी ‘ब्रेक द चेन’चे आवाहन केले हाेते. बिकट परिस्थिती लक्षात घेता काेणत्याही क्षण लाॅकडाऊनची घाेषणा हाेण्याची दाट शक्यता गृहीत धरून अकाेलेकरांनी मंगळवारी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचे चित्र हाेते.

बाजारात उसळली गर्दी

राज्य सरकारकडून किमान १५ दिवसांचा लाॅकडाऊन लागू केला जाणार असला तरी यामध्ये वाढ हाेण्याच्या विचारातून सर्वसामान्य नागरिकांनी कडधान्य खरेदीला प्राधान्य दिल्याचे दिसून आले. शहरातील दाणा बाजारात गहू, ज्वारीसह उडीद दाळ, मूग दाळ, हरभरा दाळ, तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड हाेती.

लाॅकडाऊनची शक्यता गृहीत धरून नाेकरवर्गाने महिनाभर पुरेल इतका किराणा घेतला; परंतु हातावर पाेट असणाऱ्यांनी किमान आठ दिवस पुरेल एवढेच साहित्य खरेदी केले. यावरून नागरिकांची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे दिसून येते. शासनाने लाॅकडाऊनच्या निर्बंधातून किराणा दुकानांना वगळल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.

- राजेश शेळके, व्यावसायिक, किराणा दुकान

Web Title: Crowds of citizens rush to buy necessities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.