शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

पीक विमा शेतकर्‍यांसाठी संकटमोचक!

By admin | Updated: July 30, 2014 01:20 IST

योजना शेतकर्‍यांसाठी संकटमोचक असल्याचा सूर लोकमत परिचर्चेला उपस्थित तज्ज्ञांमध्ये उमटला.

अकोला : पीक विमा हा जोखमीवर आधारित असून, उंबरठा उत्पादनाच्या आधारावर नुकसान भरपाई ठरविली जाते. या योजनेंतर्गत एका महसूल मंडळाअंतर्गत येणार्‍या १0 शेतकर्‍यांच्या शेतात पीक कापणी प्रयोग घेतले जातात. या पिकांची कापणी मात्र कृषी अधिकारी, गावचे सरपंच, पोलिस पाटील, गावकरी, शेतकर्‍यांसमोर करणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून शेती गटातील उत्पन्न कमी आल्यास शेतकर्‍यांना संरक्षित रक्कम नुकसान भरपाईच्या स्वरू पात दिली जाते. ही एकमेव योजना गावकरी व शेतकर्‍यांच्या हातात असल्याने पीक कापणीच्या वेळी शेतकर्‍यांना दक्ष राहण्याची खरी गरज आहे. त्यामुळे ही योजना शेतकर्‍यांसाठी संकटमोचक असल्याचा सूर लोकमत परिचर्चेला उपस्थित तज्ज्ञांमध्ये उमटला. लोकमतच्यावतीने मंगळवारी ह्यशेतकर्‍यांसाठी पीकवीमा योजना फायदे व तोटेह्ण या विषयावर परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या परिचर्चेत निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, नायब तहसिलदार बी.झेड सोनोने, तालुका कृषी अधिकारी के.आर. चौधरी, नवृत्ती कृषी अधिकारी कुंवरसिंह मोहने, प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव देशमुख आदी सहभागी झाले होते. परिचर्चेत सहभागी वक्त्यांनी शेती हा शेतकर्‍यांचा आत्मा आहे. शेती वर त्याचे संपूर्ण जीवन अवंलबून आहे. आणि म्हणूनच शेतीला संरक्षण मिळावे ही त्याची अपेक्षा असते. आणि या दृष्टिकोणातूनच पीक विमा योजना गरजेची असल्याचे सांगितले. पीक विमा शेतकर्‍यांना संरक्षण तर देतोच सोबतच आशावादी देखील बनवितो. सध्या शेती निसर्गाच्या लहरीवर अवलंबुन झालेली आहे. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ शेतकर्‍याच्या वाट्याला येतो. यामध्ये शेतकरी होरपळ्या जातो आणि त्याच्यावर संकट कोसळते. संकटातुन बाहेर निघण्यासाठी शेतकर्‍याला पर्याय नसतो. अशावेळी शेतकरी हवालदिल होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतो. शेतकर्‍यांचा निराशावादी दृष्टिकोण दूर होऊन त्याच्यात आशा निर्माण व्हावी आणि त्याने शेतीच्या कामात अधिक जोमाने भिडावे यासाठी त्याला दिलासा म्हणून शासनाने पीक विमा सारखी योजना आणली आहे. ही योजना शेतकर्‍यांसाठी निश्‍चित फायदेशीर ठरणारी आहे असे आशावाद वक्त्यांनी व्यक्त केला. शासनाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या अधिकार्‍यांनी पीक विमा योजनेचे महत्त्व शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले असल्याचे सांगितले. अनेक शेतकर्‍यांना ते पटले असून त्यांनी पीक विमा काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे असे सांगितले. शेतकर्‍यांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या वक्त्यांनी खरोखरच ही पीक विमा योजना शेतकर्‍यांसाठी संकटमोचक बनली असल्याचे सांगितले.