शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

कपाशीही करपली; दुष्काळाची छाया गडद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:37 PM

अकोला: पावसातील खंड, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असतानाच, जिल्ह्यातील विविध भागात कपाशीची पाने लाल झाली असून, पात्या-फुले गळत आहेत.

- संतोष येलकर

अकोला: पावसातील खंड, भूजल पातळी, जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असतानाच, जिल्ह्यातील विविध भागात कपाशीची पाने लाल झाली असून, पात्या-फुले गळत आहेत. हाताशी आलेले कपाशीचे पीक करपले असून, कपाशीच्या उत्पादनातही घट होणार असल्याने, कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणारी दुष्काळसदृश परिस्थितीची छाया गडद होत आहे.पावसातील खंड, भूजल पातळी आणि जमिनीतील आर्द्रतेचे कमी प्रमाण आणि त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी होणार असल्याची बाब विचारात घेता, जिल्ह्यातील सात तालुक्यांपैकी अकोट व पातूर हे दोन तालुके वगळता, अकोला, बाळापूर, बार्शीटाकळी, तेल्हारा व मूर्तिजापूर या पाच तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल प्राप्त झाला आहे. मूग, उडिदाचे पीक हातून गेले, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होणार असतानाच, रामगाव, मुजरे मोहंमदपूर, गोंदापूर, एकलारा, कासली बु., कासली खुर्द, आपातापा, घुसर, घुसरवाडी यासह जिल्ह्यातील विविध भागात कपाशीचे करपले आहे. कपाशीची पाने लाल झाली असून, पात्या-फुले गळत आहेत. त्यामुळे कपाशी पिकाच्या उत्पादनातही घट होणार असल्याने, जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट गडद झाल्याचे चित्र आहे.फवारणीचाही उपयोग नाही; शेतकºयांचा खर्च पाण्यात!करपलेल्या कपाशीची लाल झालेली पाने आणि फुले गळून पडत असल्याने, कपाशी पिकाला वाचविण्यासाठी शेतकºयांनी वारंवार कीटकनाशकाच्या केलेल्या फवारणीचाही उपयोग झाला नाही. त्यामुळे फवारणीसाठी कापूस उत्पादक शेतकºयांनी केलेला खर्चही पाण्यात जाणार आहे. 

कपाशीचे पीक करपले असून, लाल झालेली पाने आणि फुले गळून पडत आहेत. त्यामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. अशा परिस्थितीत कपाशीची लागवड आणि फवारणीसाठी केलेला खर्चही वसूल होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.- शिवाजीराव भरणे, कापूस उत्पादक शेतकरी, रामगाव, ता. अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी