शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

कोरोनाचा धसका : शहरे वगळून ग्रामीण भागात शाळा सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 2:39 PM

ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले.

अकोला : कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला. त्यानुसार तालुका स्तरापर्यंतच्या शहरातीलच शाळा बंद ठेवल्या जातील, असे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले. शहरांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्याबाबत संभ्रम आहे. त्यावर उद्या रविवारपर्यंत स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे.कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. तसे पत्र आरोग्य विभागाने शालेय शिक्षण विभागाला दिले. त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्या पत्रात ग्रामीण भागाचा उल्लेख नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्यत्वे ग्रामीण भागातच आहेत. त्याबाबत पत्रात उल्लेख नसल्याने शाळा सुरूच राहतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी ठग यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अकोला, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर या शहरांतही शाळा आहेत. त्या शाळा सुरू ठेवाव्या की बंद, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे. उद्या रविवारपर्यंत त्याबाबत स्पष्टीकरण येईल, असेही ठग यांनी सांगितले. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आल्या आहेत; मात्र यादरम्यान दहावीची परीक्षा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणचे जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाSchoolशाळाAkolaअकोला