शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता दिवाळी उपक्रमाला अनेक गावांमध्ये फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 14:20 IST

पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक गावांमध्ये हा उपक्रम साजरा झालाच नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

अकोला : स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी १५ ते २३ फेब्रुवारीदरम्यान विविध उपक्रम राबविण्यासोबतच घरोघरी स्वच्छता दिवाळी साजरी करण्याचाही उपक्रम राबविण्याची तयारी जिल्ह्यातील शाळांमध्ये करण्याचे पत्र तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर पन्नास टक्क्यांपेक्षाही अधिक गावांमध्ये हा उपक्रम साजरा झालाच नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. याबाबत पंचायत समिती स्तरावरून माहितीच देण्यात आलेली नाही.गतवर्षी २३ फेब्रुवारी रोजी अकोला जिल्ह्यातील सर्वच सरकारी, खासगी शाळांमध्ये स्वच्छतेची शपथ घेऊन विद्यार्थ्यांमार्फत स्वच्छतेचा संदेश दिला होता. यावर्षीही तोच उपक्रम पुढे सुरू ठेवण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार १५ ते २३ फेब्रुवारीदरम्यान स्वच्छताविषयक कार्यक्रम आयोजित करणे, त्यादरम्यान जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पालकांना माहिती दिली जाणार आहे. तसेच त्या दिवशी गावातून प्रभातफेरी काढून त्याद्वारेही जनजागृती होणार आहे.तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तसे २२ जानेवारी रोजी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्रपाठविले होते. त्यानुसार प्रत्येक गावातील शाळेत हा उपक्रम साजरा करून घेण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची होती; मात्र त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या उपक्रमाकडेही दुर्लक्ष करण्याचा प्रकार या निमित्ताने उघड झाला आहे.नियोजनानुसार २३ फेब्रुवारी रोजी ‘स्वच्छता दिवाळी’ हा उपक्रम राबविण्याचे ठरले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडून पालकांना माहिती दिली जाणार होती. तसेच हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी २२ फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी आपले घर परिसर स्वच्छ करणे, केरकचºयाची विल्हेवाट लावणे, अंगणात सडा-रांगोळी काढून सजावट करणे, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक, ग्रामस्थांनी प्रभातफेरी काढून स्वच्छतेच्या घोषणा देण्याचा कार्यक्रमही ठरला होता. यापैकी एकही कार्यक्रम अनेक ग्रामपंचायतींमध्ये साजरा झाला नसल्याची माहिती आहे.

- अस्वच्छतेच्या जनजागृतीलाही फाटासार्वजनिक अन्नदान कार्यक्रमामध्ये होणाºया अस्वच्छतेबाबत जनजागृती करणे, त्यामध्ये अन्नाची नासाडी होते, उरलेले अन्न, उष्ट्या पत्रावळ्या, द्रोण, पाण्याचे ग्लास उघड्यावर फेकले जातात. ते खाल्ल्याने जनावरांना विषबाधा होऊन ते आजारी पडतात. त्यामुळे ग्रामस्थांचे आर्थिक नुकसानही होते. याबाबत जागृती करण्याचाही उद्देश होता; मात्र एकूणच त्या सर्व उपक्रमांना फाटा देण्याचे काम शिक्षण विभागासह जिल्ह्यातील गावांमध्ये झाले आहे.

- पातूर तालुक्यात सर्वच गावे सहभागीस्वच्छता दिवाळीचा उपक्रम पातूर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायती अंतर्गत ८४ गावांमध्ये राबविण्यात आला. बचत गटांच्या महिलांना उपक्रम यशस्वी केल्याचे विस्तार अधिकारी डॉ. उल्हास मोकळकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान