शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

लग्न लागताच नवरी फुर्र; नवरदेवाला घातला गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 9:02 PM

राजस्थानातील तरुण ठरला औटघटकेचा नवरदेव

अकोला : लग्न म्हणजे दोन जिवांचे मिलन. सुंदर, सालस मुलगी पसंत करून, लग्न करून सुखी संसार थाटावा, हे प्रत्येकाचे स्वप्न असते; परंतु झालेले लग्न जर औटघटकेचे ठरले तर स्वप्नांचा चुराडा होतो. असाच काहीसा प्रकार सोमवारी दुपारी अकोल्याजवळील रिधोरा गावाजवळ घडला. राजस्थानच्या युवकासोबत लग्नाचे सात फेरे घेतल्यानंतर नवरी व तिचे नातेवाईक ५0 हजार रुपयांसह पसार झाले. फसवणूक झालेल्या युवकाच्या तक्रारीची बाळापूर पोलिसांनी नोंद केली.देखणी, सुंदर मुलगी मिळावी आणि संसार सुखाचा व्हावा, असे स्वप्न अनेक जण रंगवतात. राजस्थानामधील एक ३0 वर्षीय युवक असेच स्वप्न रंगवित असताना, त्याला अकोल्यात एका मध्यस्थ व्यक्तीमार्फत एका युवतीकडून लग्नाचा प्रस्ताव आला. मध्यस्थाने युवती लग्नाची आहे. लग्नासाठी मुलीकडच्या लोकांना खर्चासाठी ५0 हजार रुपये द्यावे लागतील, असे युवकाला सांगितले. युवकही तयार झाला. सोमवारी तो अकोल्यात आल्यावर त्याला खदान परिसरातील एक युवती मध्यस्थाने दाखविली. मुलगी पसंत आल्यावर मध्यस्थाने लग्न उरकून घेण्याची घाई केली. युवकही बोहल्यावर चढण्यास चटकन तयार झाला. मध्यस्थ, युवती आणि तिच्या काही नातेवाइकांनी रिधोरा येथील एका मंदिरामध्ये लग्न लावण्याची तयारी दर्शवल्यानंतर सर्वजण मंदिरात आले. याठिकाणी मध्यस्थ, नातेवाइकांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह लावण्यात आला. एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातल्यानंतर सात फेरे घेण्यात आले आणि लग्न पार पडले. लग्न आटोपले. आता नवरीला राजस्थानला घेऊन जाऊ, या विचारात नवरदेव होता; परंतु आपल्या नशिबात काय वाढून ठेवलं आहे, याची त्याला जराही कल्पना नव्हती.रिधोराजवळील एका हॉटेलवर नवरदेवाच्या खर्चाने सर्वांनी अल्पोपहार घेतला. यावेळी नवरी सासरी रवाना होण्यापूर्वी आम्ही तिची नातेवाइकांची शेवटची भेट घडवून आणतो. नंतर नवऱ्या मुलीची भेट होणार नाही, असे नातेवाइकांनी नवरदेवाला सांगितले. नवरदेवानेही होकार दिल्यामुळे नवरीसह तिचे नातेवाईक निघून गेले. काही वेळातच मध्यस्थ व्यक्तीही पसार झाला. खूप वेळ वाट पाहिल्यानंतरही नवरीला घेऊन तिचे नातेवाईकही आले नाहीत. कोणाचा संपर्क क्रमांक नसल्याने आता काय करावे, या विवंचनेत नवरदेव पडला. आपली फसवणूक झाल्याची जाणीव होताच, नवरदेवाने सोमवारी दुपारी कोतवाली पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली; परंतु घटनास्थळ हे बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने, पोलिसांनी बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यामुळे नवरदेवाने बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.बनावट लग्न लावून फसवणूक करणारी टोळी सक्रीयलग्नासाठी इच्छुक असलेल्या परप्रांतीय युवकांना हेरून त्यांना मुली दाखवण्यात येतात आणि त्या मुलींचा वापर करून बनावट लग्न लावून युवकांकडून लाखो रुपये उकळले जातात. नंतर काहीतरी कारण सांगून मुलीसह तिचे सहकारीसुद्धा पैसे घेऊन गायब होतात. यापूर्वी अकोल्यात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांवरून अकोल्यात बनावट लग्न लावून फसवणूक करणारी एक टोळीच सक्रिय आहे.

टॅग्स :marriageलग्न