शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

आंबेडकरांसोबत आघाडीसाठी दोन्ही काँग्रेस अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 16:22 IST

आंबेडकर आघाडीत आले, तर स्वागतच आहे, अशी भूमिका घेतल्याने दोन्ही काँग्रेस आंबेडकरांना सोबत घेण्यास अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- राजेश शेगोकार

 अकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडी जाहीर करताच काँग्रेसने आंबेडकरांचे मन वळविण्यास सुरुवात केली. यादरम्यान आंबेडकरांनी काँग्रेस चालेल; पण राष्टÑवादी नाही, असा पवित्रा घेत थेट शरद पवारांवरच निशाणा साधला होता. त्यामुळे काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीमध्ये आंबेडकरांचा समावेश होण्याची शक्यता धूसर असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी आंबेडकर आघाडीत आले, तर स्वागतच आहे, अशी भूमिका घेतल्याने दोन्ही काँग्रेस आंबेडकरांना सोबत घेण्यास अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे संकेत यापूर्वीच दिले होते. या आघाडीमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंचाही सहभाग असावा, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू असताच अ‍ॅड. आंबेडकरांनी धनगर, ओबीसी, मुस्लीम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त करून या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला १० जागा देईल, त्यांच्याशी युती केली जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली व तसा प्रस्ताव काँग्रेसला दिला. या प्रस्तावावर काँग्रेसकडून कुठलेही उत्तर भारिप-बमसंला मिळाले नाही. दरम्यानच्या काळात अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर करून या मैत्रीचा नारळ गांधी जयंतीला औरंगाबाद येथे फोडला. भारिप-बमसं व एमआयएम या मैत्रीमुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये मोठे विभाजन घडेल, या भीतीने काँग्रेसने अ‍ॅड. आंबेडकरांशी बोलणी सुरू केली. या बोलणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही पुढाकार घेत भाजपाविरोधात एकत्र येण्याची गळ आंबेडकरांना घातली. या सर्व घडामोडी सुरू असताना अ‍ॅड. आंबेडकर मात्र राष्टÑवादीवर आरोपांची झोड उठवित होते. काँग्रेससोबत आघाडी चालेल; मात्र राष्टÑवादी नाही, अशी भूमिका घेत राष्टÑवादी जातीयवादी आहे, अशी टीका केली होती.त्या टीकेला थेट शरद पवारांनी उत्तर देत आंबेडकरांच्या निवडणुकीतील विजयाचे दाखले दिले होते. या सर्व प्रकारामुळे अ‍ॅड. आंबेडकरांचा काँग्रेस आघाडीत समावेश होण्याची शक्यता धूसर असतानाच आता अजित पवारांनी आंबेडकरांच्या वक्त व्याचा त्यांच्या समावेशावर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केल्याने भारिप-बमसं काँग्रेस आघाडी होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस जागा वाटपाच्या बोलणीमध्ये अकोल्याची जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली असल्यामुळे ही जागा अ‍ॅड. आंबेडकरांसाठीच असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस