शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

आंबेडकरांसोबत आघाडीसाठी दोन्ही काँग्रेस अनुकूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 16:22 IST

आंबेडकर आघाडीत आले, तर स्वागतच आहे, अशी भूमिका घेतल्याने दोन्ही काँग्रेस आंबेडकरांना सोबत घेण्यास अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- राजेश शेगोकार

 अकोला : सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून राजकारणात ‘अकोला पॅटर्न’ निर्माण करून प्रस्थापित राजकीय पक्षांना पर्याय देणाऱ्या अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जवळपास प्रत्येक निवडणुकीत नवा प्रयोग केला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी त्यांनी ‘एमआयएम’सोबत आघाडी जाहीर करताच काँग्रेसने आंबेडकरांचे मन वळविण्यास सुरुवात केली. यादरम्यान आंबेडकरांनी काँग्रेस चालेल; पण राष्टÑवादी नाही, असा पवित्रा घेत थेट शरद पवारांवरच निशाणा साधला होता. त्यामुळे काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडीमध्ये आंबेडकरांचा समावेश होण्याची शक्यता धूसर असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री व राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी आंबेडकर आघाडीत आले, तर स्वागतच आहे, अशी भूमिका घेतल्याने दोन्ही काँग्रेस आंबेडकरांना सोबत घेण्यास अनुकूल असल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजपाचा झंझावात थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसने मित्रपक्षांना सोबत घेऊन आघाडीचे संकेत यापूर्वीच दिले होते. या आघाडीमध्ये अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या भारिप-बमसंचाही सहभाग असावा, अशी चर्चा काँग्रेसच्या गोटात सुरू असताच अ‍ॅड. आंबेडकरांनी धनगर, ओबीसी, मुस्लीम अशा वंचित जातीतील उमेदवारांना एकत्र घेऊन आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याचा मानस व्यक्त करून या उमेदवारांना न्याय देण्यासाठी जो पुरोगामी पक्ष आम्हाला १० जागा देईल, त्यांच्याशी युती केली जाईल, अशी भूमिका स्पष्ट केली व तसा प्रस्ताव काँग्रेसला दिला. या प्रस्तावावर काँग्रेसकडून कुठलेही उत्तर भारिप-बमसंला मिळाले नाही. दरम्यानच्या काळात अ‍ॅड. आंबेडकरांनी ‘एमआयएम’सोबत मैत्री जाहीर करून या मैत्रीचा नारळ गांधी जयंतीला औरंगाबाद येथे फोडला. भारिप-बमसं व एमआयएम या मैत्रीमुळे धर्मनिरपेक्ष मतांमध्ये मोठे विभाजन घडेल, या भीतीने काँग्रेसने अ‍ॅड. आंबेडकरांशी बोलणी सुरू केली. या बोलणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीही पुढाकार घेत भाजपाविरोधात एकत्र येण्याची गळ आंबेडकरांना घातली. या सर्व घडामोडी सुरू असताना अ‍ॅड. आंबेडकर मात्र राष्टÑवादीवर आरोपांची झोड उठवित होते. काँग्रेससोबत आघाडी चालेल; मात्र राष्टÑवादी नाही, अशी भूमिका घेत राष्टÑवादी जातीयवादी आहे, अशी टीका केली होती.त्या टीकेला थेट शरद पवारांनी उत्तर देत आंबेडकरांच्या निवडणुकीतील विजयाचे दाखले दिले होते. या सर्व प्रकारामुळे अ‍ॅड. आंबेडकरांचा काँग्रेस आघाडीत समावेश होण्याची शक्यता धूसर असतानाच आता अजित पवारांनी आंबेडकरांच्या वक्त व्याचा त्यांच्या समावेशावर परिणाम होणार नाही, असे स्पष्ट केल्याने भारिप-बमसं काँग्रेस आघाडी होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस जागा वाटपाच्या बोलणीमध्ये अकोल्याची जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी दोन्ही काँग्रेसने दर्शविली असल्यामुळे ही जागा अ‍ॅड. आंबेडकरांसाठीच असावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांचे धाबे दणाणले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliticsराजकारणPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस