शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात; ५० शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 11:00 AM

MSEDCL News ५० शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र, कृषी ऊर्जा पर्वाची लोगो असलेली टि शर्ट आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला.

अकोला : वीज जोडणी बाबतचे शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने व त्वरित सोडविण्यासाठी तसेच कृषी पंपाच्या थकबाकीतून मोठा दिलासा देत शेतकऱ्यांना थेट ६६ टक्क्यांची सवलत देण्याच्या उद्देशाने महावितरणने आयोजित केलेल्या कृषी ऊर्जा पर्वाची सुरुवात अकोला परिमंडळात झाली आहे. यानिमित्ताने जिल्हयातील थकबाकीमुक्त झालेल्या ५० शेतकऱ्यांचा प्रातिनीधिक स्वरूपात सन्मानपत्र, कृषी ऊर्जा पर्वाची लोगो असलेली टि शर्ट आणि टोपी देऊन सत्कार करण्यात आला तसेच यावेळी मुख्य अभियंता अनिल डोये यांच्या हस्ते ''कृषी ऊर्जा पर्वाच्या'' बॅनरचे उद्‌घाटन करण्यात आले.

राज्याचे ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची थकबाकीतून ६६ टक्क्यांची माफी देत थकबाकी कोरी करून देणे. सहाशे मीटरच्या आत असलेल्या कृषी पंपांना लघूदाब व उच्चदाब वाहिनीव्दारे वीज जोडणी देणे , ६०० मीटर पेक्षा जास्त अंतर असलेल्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाव्दारे वीज जोडणी देण्याच्या उद्देशाने महाकृषी ऊर्जा अभियान राज्यात सर्वत्र राबविले जात आहे.

व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल तसेच औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉक्टर नरेश गीते, नागपुर विभागाचे प्रादेशीक संचालक सुहास रंगारी यांच्या निर्देशानुसार १ मार्च ते १४ एप्रिल या ४५ दिवसांच्या कालावधीत विविध उपाययोजनांच्या माध्यमातून ''कृषी ऊर्जा पर्व'' संपूर्ण राज्यभर राबविण्यात येत आहे. या पर्वात शेतकऱ्यांना त्वरीत नविन वीज जोडणी,सौर कृषी वाहिनीव्दारे दिवसा वीज पुरवठा,कृषी ग्राहकांना थकबाकीत ६६ टक्क्यापर्यंत असलेली सुट,कृषी ग्राहकांकरिता पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण,ग्रामपंचायतींचा सहभाग व सक्षमीकरण आदीबाबत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. विद्युत भवन येथे १० थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाFarmerशेतकरी