शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
2
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
3
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
4
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
5
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
6
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
7
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
8
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
9
'स्वतःच्या प्रमोशनसाठी रेल्वेचा वापर', मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर आरोप
10
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
11
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
12
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
13
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
14
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
15
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
16
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
17
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
18
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
19
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते, हा एक भयंकर क्षण..."; प्रवाशाने सांगितलं नेमकं काय घडलं?

बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधी कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 3:01 PM

अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे.

अकोला: आर्थिक वर्ष संपत आले असताना जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नसून, बळीराजा जलसंजीवनी योजनेचा निधीही कागदावरच असल्याने, यावर्षीही पूर्णा बॅरेजसह इतर प्रकल्पांच्या कामावर परिणाम होणार आहे.जिल्ह्यात पूर्णा बॅरेज-२, कवठा, शहापूर, नया अंदुरा, उमा, काटेपूर्णा, घुंगशी बॅरेजची कामे अर्धवट असून, मूर्तिजापूर तालुक्यातील वाई संग्रहकाचेही पाच टक्के काम शिल्लक आहे. या प्रकल्पांसाठी लागणारा उपलब्ध नियमित निधी अपुरा असून, अतिरिक्त निधीची गरज आहे. यासाठीचे समायोजन पुढच्या महिन्यात केले जाणार असल्याचे पाटबंधारेच्या सूत्राने सांगितले; पण पुढच्या महिन्यात झाल्यास एक महिन्यात किती निधी खर्च करणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. राज्य शासनाचा निधी अपुरा पडत असल्याने केंद्र शासनाने बळीराजा जलसंजीवनी योजनेतून विभागासाठी १,४०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. तथापि, यातील एकही पैसा अद्याप मिळाला नसल्याचे चित्र आहे. खारपाणपट्ट्यातील पूर्णा बॅरेजचे काम ९० टक्के झाले असून, यावर्षी जून महिन्यात या बॅरेजमध्ये जलसाठा करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे; पण या बॅरेजच्या वक्रद्वारासह इतर महत्त्वाची कामे अद्याप झाली नाहीत. त्यामुळे यावर्षी जूनमध्ये पाणी साठवणार कसे, असा प्रश्न या भागातील शेतकऱ्यांना पडला आहे.रेतीचे दर अद्याप निश्चित झाले नसून, सिमेंटीकरणाचे कामही करायचे आहे. पंप हाउसचे काम कधी होणार, हा प्रश्न आहे. आता पंप हाउसऐवजी नवीनच पंप टाकण्याची चर्चा सुरू आहे. म्हणजे पुन्हा या नवीन पंपाचे नकाशे, डिझाइनसाठी दोन, चार वर्षे लागू शकतात. अगोदरच्याच डिझाइनला प्राप्त करण्यासाठी पाटबंधारे विभागाला वाºया कराव्या लागल्या. त्यानंतर तीन ते चार वर्षांनंतर हे डिझाइन प्राप्त झाले. याच पंपाचे बांधकाम करण्यासाठी आणखी एक-दोन वर्षे लागण्याची शक्यता पाटबंधारे विभागाच्या सूत्राने व्यक्त केली. खारपाणपट्ट्यातील हे बॅरेज शेतकºयांना दिलासा देणारे तर आहेच, शिवाय यातून अकोलकरांनाही पिण्यासाठी पाणी मिळू शकते, असे सर्व असताना या बॅरेजच्या कामाला पूर्ण निधी का मिळत नाही, असा प्रश्न या भागातील शेतकºयांना पडला आहे.

- खारपाणपट्ट्यात सतत जाणवणारी भीषण दुष्काळी स्थिती बघता या बॅरेजचे काम होणे गरजेचे आहे; परंतु अद्याप या कामाला गती नसून, निधीचीही पूर्तता नसल्याने मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींना नुकतेच निवेदन दिले आहे.प्रदीपबाप्पू देशमुख,सचिव,अकोला जिल्हा जलसंघर्ष समिती.

 

टॅग्स :AkolaअकोलाIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पgovernment schemeसरकारी योजना