शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

वाद टाळण्यासाठी जमीन एकत्रीकरणाची चाचपणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 11:13 IST

अकोला : येत्या काळात जमिनीचे तुकडे पडू नयेत, त्यातून चतु:सिमा, रस्त्याच्या कारणावरून वाद होणे, छोट्या तुकड्यांमध्ये विकास कामे करता न येणे, या समस्यांवर उपाय म्हणून जमीन एकत्रीकरण योजना पुन्हा सुरू करण्याची तयारी राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली आहे.

ठळक मुद्देवारसा हक्क, खरेदी-विक्री व्यवहाराने जमिनीचे सतत तुकडे पडत आहेत.शेती कसण्यासाठी अवजारे, खते, बियाण्यांची वाहतूक करण्यातही अडथळे येतात.जमीन एकत्रीकरणाची योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामसभेत ७५ टक्के शेतकºयांनी मागणी केल्यास हा उपक्रम सुरू होणार आहे.

 -  सदानंद सिरसाटअकोला : येत्या काळात जमिनीचे तुकडे पडू नयेत, त्यातून चतु:सिमा, रस्त्याच्या कारणावरून वाद होणे, छोट्या तुकड्यांमध्ये विकास कामे करता न येणे, या समस्यांवर उपाय म्हणून जमीन एकत्रीकरण योजना पुन्हा सुरू करण्याची तयारी राज्याच्या जमाबंदी आयुक्तांनी केली आहे. त्यासाठी ग्रामसभेत चर्चेतून योजना राबवण्याचे ठराव मागवण्यात आले. दरम्यान कायद्यानुसार अकोला जिल्ह्यातील ३८९ गावांमध्ये एकत्रीकरण झालेले नाही, त्या गावांना आता संधी देण्यात आली आहे.वाढत्या लोकसंख्येचा भार सतत जमिनीवर पडत आहे. वारसा हक्क, खरेदी-विक्री व्यवहाराने जमिनीचे सतत तुकडे पडत आहेत. ते केवळ लहानच नाहीत तर इतरत्र विखुरलेल्या रूपातही आहेत. त्या तुकड्यांची शेती कसणे कठीण आहे. त्यातच चतु:सिमा, शेतरस्त्यांवरून सातत्याने वादही होतात. शेती कसण्यासाठी अवजारे, खते, बियाण्यांची वाहतूक करण्यातही अडथळे येतात. त्याशिवाय, तुकड्यांमध्ये विहीर खोदणे, शेततळे, पाण्याचे पाट, चर खोदणे, यांसारखी विकास कामेही करता येत नाहीत. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून शासनाने आधीच ‘मुंबईचे धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणे व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम १९४७’ हा कायदा केला. राज्याच्या पुनर्रचनेनंतर विदर्भ, मराठवाड्यात १ एप्रिल १९५९ रोजी लागू करण्यात आला. त्या कायद्यानुसार राज्यातील ४४३२१ पैकी ३११५१ गावांमध्ये ही योजना राबवण्यात आली. ११७९६ गावांमध्ये ती अद्यापही राबवलेली नाही. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील ३८९ गावे वंचित आहेत. त्यानंतर १९९३ मध्ये योजना राबवण्यास शासनाने स्थगिती दिली. त्याचवेळी गावातील ७५ टक्के शेतकऱ्यांनी मागणी केल्यास योजना सुरू करता येईल, असाही ठराव घेतला. त्यानुसार जमीन एकत्रीकरणाची योजना पुन्हा सुरू करण्यासाठी ग्रामसभेत ७५ टक्के शेतकºयांनी मागणी केल्यास हा उपक्रम सुरू होणार आहे.- काय होणार एकत्रीकरणात...गावाचा अधिकार अभिलेख अद्ययावत करणे, तुकड्यांची जमीन अदलाबदल करून त्याचा ताबा संबंधित शेतकºयांना देणे, शेतकºयांच्या जमिनीचा तपशील (खातेदाराचे नाव, गट क्रमांक, क्षेत्र, आकार) दर्शवणारा पंजिबद्ध कागद दिला जाणार आहे.

- ग्रामसभेमध्ये होणार मागणीचा ठरावगावातील जमिनीचे एकत्रीकरण करण्यासाठी ७५ टक्के शेतकºयांनी सहीनिशी मागणीचा ठराव घ्यावा, ग्रामसभेत त्यावर चर्चा व्हावी, याबाबतचे निर्देश २० मार्च रोजीच्या बैठकीत सर्व गटविकास अधिकाºयांना जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख यांनी दिले. त्यावेळी जमीन एकत्रीकरण न झालेली गावे आणि त्यातील खातेदारांची माहिती भूमिअभिलेख विभागाकडून ठरले; मात्र आता केवळ गावांची यादी पंचायत विभागाला देण्यात आली. खातेदारांची संख्या महाभूलेख किंवा महसूल विभागाकडून घेण्याचे सांगण्यात आले. पंचायत विभागाने सर्व गटविकास अधिकाºयांना पत्र देत ग्रामसभा घेण्याचे बजावले आहे. 

जिल्ह्यातील वंचित गावेतालुका           गावेअकोला           ४४अकोट             ४५मूर्तिजापूर      ०६बार्शीटाकळी   १०४पातूर             ९५बाळापूर         २६तेल्हारा          ६९

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी