शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2025 23:09 IST

ओव्हरहेड वायरमधील हा तांत्रिक बिघाड अचानक घडला असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गाड्या मार्गातच अडकून पडल्या आहेत.

मूर्तिजापूर (जि.अकोला) : मुंबई-अमरावती दरम्यान धावणाऱ्या अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेच्या अप-डाऊन मार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. ही घटना शनिवारी घडली असून अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर रेल्वे स्थानकाजवळ सदरचा प्रकार समोर आला. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई आणि हावडाकडे जाणाऱ्या विविध महत्त्वाच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून, प्रवाशांचे प्रचंड हाल सुरू झाले आहेत.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही वायर तुटल्यामुळे अमरावती एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस, अमरावती-पुणे एक्सप्रेस, नागपूर-पुणे एक्सप्रेस अशा अनेक गाड्यांना नजीकच्या स्थानकांवर थांबवण्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू केले असून, किमान दोन तासांचा कालावधी लागणार असल्याचे प्राथमिक अंदाज आहेत.

वाचा >>वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड

रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हरहेड वायरमधील हा तांत्रिक बिघाड अचानक घडला असून, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक गाड्या मार्गातच अडकून पडल्या आहेत. काही गाड्यांना नागपूर, अकोला, मंढळा रोड, बदलापूर आणि शेगाव स्थानकांवर तात्पुरते थांबवण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचं वातावरण पसरलं आहे.

अनेक ठिकाणच्या प्रवाशांना त्रास

मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, हावडा या प्रमुख शहरांमध्ये प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना या गोंधळाचा फटका बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत रेल्वे व्यवस्थेवरील संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने काही ठिकाणी अल्पोपहार आणि पाण्याची व्यवस्था केली आहे, मात्र ती अपुरी असल्याच्या तक्रारीही येत आहेत.

रेल्वेच्या इंजिनियरिंग आणि तांत्रिक पथकांनी घटनास्थळी दाखल होत ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम वेगाने सुरू केलं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दोन तासांनंतर वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. मात्र, काही गाड्यांचे वेळापत्रक पूर्णतः कोलमडल्याने पुढील काही तास प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

ही घटना पुन्हा एकदा भारतीय रेल्वेच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रश्नचिन्ह उभं करते. वारंवार होणारे तांत्रिक बिघाड, खराब देखभाल आणि तत्काळ पर्यायांची अनुपस्थिती यामुळे प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचं चित्र आहे.

यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाही. मात्र, अंबा एक्सप्रेससह इतर गाड्यांच्या नियमिततेसाठी प्रशासन तत्काळ उपाययोजना करत आहे, असे सूत्रांकडून समजते.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेnagpurनागपूरMumbaiमुंबई