शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अकोट-तेल्हार्‍याची केळी पोहचली इराकमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:05 IST

अकोट  : शेतकरी व बाजारपेठमधील दलालाची साखळी नष्ट होऊन अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्या गेला आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी ही इराकमध्ये पोहचली आहे.

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट  : शेतकरी व बाजारपेठमधील दलालाची साखळी नष्ट होऊन अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्या गेला आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी ही इराकमध्ये पोहचली आहे. अकोटच्या केळीची उत्कृष्ट गुणवत्ता असल्याने वाढती मागणी पाहता मुंबई येथील तीन निर्यातकर्त्यांनी शासनाच्या माध्यमातून अकोट उप विभागातील केळी पेर्‍याकरिता ५00 एकर शेतीचा करार शेतकर्‍यांसोबत केला आहे. त्यामुळे नववर्षात या भागातील केळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करणार आहे. काळी कसदार जमीन, पाण्याची उपलब्धता व केळीच्या पिकाला पोषक हवामान असताना केळीच्या उत्पादनाला मात्र पाहिजे तसा भाव या  परिसरात मिळत नव्हता. शिवाय शेतकर्‍यांची फसवणूक व लुटीचे प्रकार वाढीस लागले असतानाच केळीला योग्य व जास्तीत जास्त मूल्य मिळावे, याकरिता भारत सरकारच्या महाराष्ट्र राज्य कृषी व पणन विकास मंडळाने केळी निर्यात करणारे व्यापारी, शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी उपलब्ध करून दिली. पूर्वी या भागातली केळी अंजनगाव, रावेल या बाजारपेठेत जात होती. याठिकाणी केळीचे ग्रेड पाडून केळी उत्पादकांना वेठीस धरण्यात येत होते. केळी उत्पादकांची होत असलेली पिळवणूक पाहता उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर व पणजचे पोलीस पाटील पंजाबराव बोचे यांनी तत्कालीन अकोला जिल्हाधिकारी तथा सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेले डॉ.श्रीकर परदेशी यांच्या माध्यमातून भारत सरकारची कृषी व साधन प्रक्रियायुक्त मालाची आयात-निर्यात धोरण ठरविणारी संस्था (अपेडा) च्या माध्यमातून दिल्ली व मुंबई येथील कार्यालयांशी संपर्क साधून अकोटच्या  केळीची गुणवत्ता पटवून दिली. त्यानंतर थेट तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोट येथे केळी उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांची बैठक घेऊन शासनाचा निर्यात व आयात धोरणाची माहिती विशद केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकर्‍यांना योग्य व जास्तीत जास्त मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळावे म्हणून पुढाकार घेत हिरवी झेंडी दाखवून केळीचा पहिला कंटेनर इराकला रवाना केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अकोटच्या केळीची मागणी पाहता मुंबईच्या तीन निर्यातकर्त्यांनी अकोट उपविभागात ५00 एकर शेतीचा करार केळी उत्पादक शेतकर्‍यांसोबत जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने केला.तर पोलीस पाटील पंजाबराव बोचे यांच्यासह ११ जणांनी मिळून नरनाळा प्रोड्यूसर कंपनी स्थापन करुन, १00 शेतकर्‍यांचे शेअर्स या कंपनीमध्ये घेतले. ज्या शेतकर्‍यांचा माल निर्यातीसाठी घेण्यात येईल, त्यांना रावेलच्या बाजारभावापेक्षा १00 रुपये प्रतिकिं्वटल जास्त दर निश्‍चित करण्यात आला आहे. तसेच या करारात शेतातील माल काढल्यानंतर शेतकर्‍यांना त्वरित रक्कम देण्याबाबत करार करण्यात आला आहे.  कंपनीचे प्रतिनिधी, तालुका प्रशासनाचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत शेतकर्‍यांची यादी तयार करून, आय एन आय कंपनीकडे देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या उपक्रमाची जबाबदारी मंडळ अधिकारी राजेश बोडखे यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे पंजाबराव बोचे यांनी सांगितले.   

अकोट उप विभागातील केळी इराकला पोहचली आहे. केळीला चांगले मूल्य मिळत असल्याने निर्यातदार कंपन्यांनी शेतीकरार केला आहे. त्यांना इतर बाजारपेठेच्या तुलनेत १00 रुपयांनी अधिक भाव दिल्या जाणार आहे. या निर्यात धोरणाकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल विभाग अकोट यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळाले आहे. - पंजाबराव बोचे, केळी उत्पादक, पणज 

टॅग्स :akotअकोटTelharaतेल्हारा