शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

अकोट-तेल्हार्‍याची केळी पोहचली इराकमध्ये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 01:05 IST

अकोट  : शेतकरी व बाजारपेठमधील दलालाची साखळी नष्ट होऊन अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्या गेला आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी ही इराकमध्ये पोहचली आहे.

विजय शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोट  : शेतकरी व बाजारपेठमधील दलालाची साखळी नष्ट होऊन अकोट तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडल्या गेला आहे. अकोट व तेल्हारा तालुक्यातील केळी ही इराकमध्ये पोहचली आहे. अकोटच्या केळीची उत्कृष्ट गुणवत्ता असल्याने वाढती मागणी पाहता मुंबई येथील तीन निर्यातकर्त्यांनी शासनाच्या माध्यमातून अकोट उप विभागातील केळी पेर्‍याकरिता ५00 एकर शेतीचा करार शेतकर्‍यांसोबत केला आहे. त्यामुळे नववर्षात या भागातील केळी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करणार आहे. काळी कसदार जमीन, पाण्याची उपलब्धता व केळीच्या पिकाला पोषक हवामान असताना केळीच्या उत्पादनाला मात्र पाहिजे तसा भाव या  परिसरात मिळत नव्हता. शिवाय शेतकर्‍यांची फसवणूक व लुटीचे प्रकार वाढीस लागले असतानाच केळीला योग्य व जास्तीत जास्त मूल्य मिळावे, याकरिता भारत सरकारच्या महाराष्ट्र राज्य कृषी व पणन विकास मंडळाने केळी निर्यात करणारे व्यापारी, शेतकरी यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची संधी उपलब्ध करून दिली. पूर्वी या भागातली केळी अंजनगाव, रावेल या बाजारपेठेत जात होती. याठिकाणी केळीचे ग्रेड पाडून केळी उत्पादकांना वेठीस धरण्यात येत होते. केळी उत्पादकांची होत असलेली पिळवणूक पाहता उप जिल्हाधिकारी अशोक अमानकर व पणजचे पोलीस पाटील पंजाबराव बोचे यांनी तत्कालीन अकोला जिल्हाधिकारी तथा सध्या पंतप्रधान कार्यालयात कार्यरत असलेले डॉ.श्रीकर परदेशी यांच्या माध्यमातून भारत सरकारची कृषी व साधन प्रक्रियायुक्त मालाची आयात-निर्यात धोरण ठरविणारी संस्था (अपेडा) च्या माध्यमातून दिल्ली व मुंबई येथील कार्यालयांशी संपर्क साधून अकोटच्या  केळीची गुणवत्ता पटवून दिली. त्यानंतर थेट तत्कालीन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी अकोट येथे केळी उत्पादक शेतकरी व निर्यातदार यांची बैठक घेऊन शासनाचा निर्यात व आयात धोरणाची माहिती विशद केली. त्यानंतर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी शेतकर्‍यांना योग्य व जास्तीत जास्त मूल्य आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मिळावे म्हणून पुढाकार घेत हिरवी झेंडी दाखवून केळीचा पहिला कंटेनर इराकला रवाना केला. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अकोटच्या केळीची मागणी पाहता मुंबईच्या तीन निर्यातकर्त्यांनी अकोट उपविभागात ५00 एकर शेतीचा करार केळी उत्पादक शेतकर्‍यांसोबत जिल्हाधिकार्‍यांच्या मध्यस्थीने केला.तर पोलीस पाटील पंजाबराव बोचे यांच्यासह ११ जणांनी मिळून नरनाळा प्रोड्यूसर कंपनी स्थापन करुन, १00 शेतकर्‍यांचे शेअर्स या कंपनीमध्ये घेतले. ज्या शेतकर्‍यांचा माल निर्यातीसाठी घेण्यात येईल, त्यांना रावेलच्या बाजारभावापेक्षा १00 रुपये प्रतिकिं्वटल जास्त दर निश्‍चित करण्यात आला आहे. तसेच या करारात शेतातील माल काढल्यानंतर शेतकर्‍यांना त्वरित रक्कम देण्याबाबत करार करण्यात आला आहे.  कंपनीचे प्रतिनिधी, तालुका प्रशासनाचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत शेतकर्‍यांची यादी तयार करून, आय एन आय कंपनीकडे देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार या उपक्रमाची जबाबदारी मंडळ अधिकारी राजेश बोडखे यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे पंजाबराव बोचे यांनी सांगितले.   

अकोट उप विभागातील केळी इराकला पोहचली आहे. केळीला चांगले मूल्य मिळत असल्याने निर्यातदार कंपन्यांनी शेतीकरार केला आहे. त्यांना इतर बाजारपेठेच्या तुलनेत १00 रुपयांनी अधिक भाव दिल्या जाणार आहे. या निर्यात धोरणाकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालय व महसूल विभाग अकोट यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकर्‍यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळाले आहे. - पंजाबराव बोचे, केळी उत्पादक, पणज 

टॅग्स :akotअकोटTelharaतेल्हारा