शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचा राज्यात दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:23 IST

अकोला: केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासित प्रदेशासह सर्व राज्यांतील पोलीस ठाण्यांचा एका विशेष पथकाद्वारे सर्व्हे केल्यानंतर यामध्ये विविध निकषांवर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे.

- सचिन राऊतअकोला: केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील केंद्रशासित प्रदेशासह सर्व राज्यांतील पोलीस ठाण्यांचा एका विशेष पथकाद्वारे सर्व्हे केल्यानंतर यामध्ये विविध निकषांवर अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. प्रथम क्रमांक सातारा जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्याला मिळाला असून, अकोट ग्रामीण पोलीस ठाणे देशातून ५९ व्या क्रमांकावर आले आहे. अकोट ग्रामीण पोलिसांच्या योग्य कारभारामुळे त्यांनी अकोला पोलिसांची मान राज्यभर गौरवाने उंचावली आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एका विशेष पथकाने तीन महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील संवेदनशील तसेच दंगलीने कुप्रसिद्ध असलेल्या अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात धडक देऊन अचानक सर्वेक्षण केले होते. यामध्ये जनसंपर्क, गुन्हे शोध, दोषसिद्धी, तक्रार देण्यासाठी आलेल्यांना वागणूक तसेच हद्दीत घटना घडल्यानंतर किती वेळात प्रतिसाद देण्यात येते, तक्रारकर्त्यांची दखल कशाप्रकारे घेतल्या जाते, ठाणेदारांची कर्मचाऱ्यासोबत वागणूक, महिला व बालकांना देण्यात येणाºया वागणुकीची या पथकाने बनावट तक्रारकर्ते पाठवून तपासणी केली होती. यामध्ये अकोट ग्रामीणचे ठाणेदार मिलिंद बहाकर यांचे कामकाज या पथकाने अचानक तपासल्यानंतर त्यांनी प्रत्येकाला दिलेली वागणूक सौजन्यपूर्वक आणि नागरिकांशी असलेला संपर्क योग्य असल्याचे समोर आले. यासोबतच पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांचेही मार्गदर्शन योग्य असल्याचे दिसून आले. या पोलीस ठाण्यातील वाहनांवरील जीपीएस सिस्टीम, वाहनांची देखभाल, ठाण्याची इमारत भौतिक सुविधा या सर्वच विषयांवर सर्वेक्षण केल्यानंतर त्यामध्ये अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याचा कारभार राज्यातील पोलीस ठाण्यांच्या तुलनेत योग्य असल्याचे समोर येताच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या पथकाने या पोलीस ठाण्याला राज्यात दुसरा क्रमांक दिला असून, सातारा येथील पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक आला आहे. अकोट ग्रामीण पोलीस ठाणे देशात ५९ व्या क्रमांकावर असल्याने अकोला पोलिसांच्या इतिहासात प्रथमच या सर्व्हेत अकोला जिल्ह्यातील पोलीस ठाण्याचा क्रमांक लागला आहे. राजस्थानमधील पोलीस ठाणे देशात ‘नंबर वन’देशातील पोलीस ठाण्यांच्या कामकाजाचे तपासणी आणि सर्वेक्षण गृहमंत्रालयाने केल्यानंतर यामध्ये राजस्थानमधील एका पोलीस ठाण्याचा प्रथम क्रमांक आला आहे, तर केंद्रशासित प्रदेशातील अंदमान निकोबार येथील पोर्टब्लेअर पोलीस ठाण्याच्या देशात द्वितीय क्रमांक आला आहे. या यादीत राज्यातील सातारा आणि अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याची कामगिरी झळकल्याने महाराष्ट्र पोलिसांची मान गौरवाने उंचावली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाakotअकोटPolice Stationपोलीस ठाणे