शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

कृषी योजनांसाठी शेतकऱ्यांवर भरवसा नाही; वस्तू खरेदीची रक्कम अदा केल्याचा पुरावा द्यावा लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:08 PM

अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वाटप करावयाच्या वस्तूंसाठी खरेदी पावती नव्हे, तर संबंधित दुकानदाराला वस्तूची किंमत अदा केल्याचा बँकेतील नोंदीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तरच लाभाची रक्कम खात्यात जमा होणार आहे.

ठळक मुद्देशासनाच्या सर्व विभागांना वस्तू वाटपाचा लाभ रोख रकमेत देण्याचे बंधनकारक करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वाटप करावयाच्या वस्तूंसाठी खरेदी पावती नव्हे, तर संबंधित दुकानदाराला वस्तूची किंमत अदा केल्याचा बँकेतील नोंदीचा पुरावा द्यावा लागणार आहे. याप्रकाराने आधी रक्कम कोठून आणावी, बँकेद्वारेच अदा कशी करावी, या अडचणीतून मार्ग काढताना गरीब लाभार्थींच्या नाकी नऊ येणार आहेत.

अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून वाटप करावयाच्या वस्तूंसाठी खरेदी पावती नव्हे, तर संबंधित दुकानदाराला वस्तूची किंमत अदा केल्याचा बँकेतील नोंदीचा पुरावा द्यावा लागणार आहे. तरच लाभाची रक्कम खात्यात जमा होणार आहे. याप्रकाराने आधी रक्कम कोठून आणावी, बँकेद्वारेच अदा कशी करावी, या अडचणीतून मार्ग काढताना गरीब लाभार्थींच्या नाकी नऊ येणार आहेत. त्यामुळे ‘लाभ नको, पण अटी आवर’ असेच म्हणावे लागत आहे.शासनाने थेट लाभ हस्तांतरण प्रक्रिया सुरू केली. त्यासाठी ५ डिसेंबर २०१६ रोजी नियोजन विभागाने आदेश काढला. त्या आदेशानुसार शासनाच्या सर्व विभागांना वस्तू वाटपाचा लाभ रोख रकमेत देण्याचे बंधनकारक करण्यात आले. त्यामध्ये आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, मंडळे, महामंडळांनी कल्याणकारी योजना राबवण्याची कार्यपद्धतीही ठरवून देण्यात आली. अनुदानाची रक्कम खात्यात जमा करण्यापूर्वी संबंधित यंत्रणेने लाभार्थीने खरेदी केलेल्या वस्तूची व सादर केलेल्या पावतीची खातरजमा करावी, त्यानंतर लाभार्थींच्या आधार कार्ड संलग्नित बँक खात्यात रक्कम जमा करण्याचे म्हटले आहे. ही सोपी आणि लाभार्थींच्या हिताची पद्धत राज्याच्या कृषी विभागाने किचकट केली. त्यातून लाभार्थींच्या पदरात अनुदान पडूच नये, अशी मेख मारण्यात आली आहे.

 कृषी विभागाने मारली मेख!नियोजन विभागाच्या निर्णयानंतर राज्याच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभागाने स्वतंत्र आदेश देत अटींतून मेख मारली आहे. २१ जानेवारी २०१७ रोजीचा निर्णय कृषी विभागाच्या केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांसाठी लागू करण्यात आला.

 थेट लाभ हस्तांतरणापूर्वी बँक नोंदीचा पुरावा आवश्यककृषी विभागाच्या आदेशात थेट लाभ हस्तांतरण पद्धतही ठरवून देण्यात आली. त्यामध्ये लाभार्थी शेतकºयांनी कृषी अवजारांची खरेदी कॅशलेस पद्धतीने त्यांच्या आधार क्रमांकाशी निगडित स्वत:च्या बँक खात्यातून विक्रेत्याला अवजाराच्या किमतीची अदायगी करणे आवश्यक आहे. त्यासाठी एनइएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस किंवा धनादेशाद्वारे दिलेली रक्कम विक्रेत्याच्या खात्यात जमा झाल्याच्या बँकेतील नोंदीचा पुरावा कृषी विभागाला द्यावा लागणार आहे. या योजनांच्या लाभार्थींची अडचणजिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या योजनेमध्ये शेतीसाठी उपयुक्त असलेल्या काही वस्तू महाग आहेत. ४५ ते ५० हजार रुपयेही किमतीच्या वस्तू आहेत. त्या लाभार्थींना बँक नोंदीचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्याशिवाय, या विभागाच्या विविध योजनेच्या जवळपास चार हजार लाभार्थींना हीच कसरत करावी लागणार आहे.

 

टॅग्स :Akola cityअकोला शहरzpजिल्हा परिषद