शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

अकोला: यंदाच्या कावड महोत्सवावर कोरोनाचे सावट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:59 AM

यंदा कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता, या महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

- आशिष गावंडे  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: श्रावण महिन्यात शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला पूर्णा नदीच्या पाण्याने जलाभिषेक करण्याची परंपरा मागील अनेक वर्षांपासून अविरत सुरू आहे. येत्या २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून, १७ आॅगस्ट रोजी शेवटचा श्रावण सोमवार आहे. यंदा कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता, या महोत्सवाच्या आयोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांचे हित लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू तसेच जिल्हा प्रशासन कोणता निर्णय घेतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेला जोपासणाऱ्या पालखी व कावड उत्सवाला यंदा ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. श्रावण महिन्याला प्रारंभ होण्यापूर्वीच या महोत्सवात सहभागी होणाºया शिवभक्तांना कावडच्या तयारीचे वेध लागतात. श्रावण महिन्यातील शेवटच्या चौथ्या सोमवारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन कावडधारी आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक करतात. त्यांच्या स्वागतासाठी अकोलेकर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारून चहा, नाश्ता, फराळ आदी व्यवस्था उभारतात. हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या कानाकोपºयातील भाविक अकोल्यात दाखल होत असतात. येत्या २१ जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होणार असून, यंदा संसर्गजन्य कोरोना विषाणूचे सावट लक्षात घेता पालखी व कावडचे आयोजन करणाºया शिवभक्त मंडळांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी एकमेक ांच्या संपर्कात न येण्याची नियमावली असल्यामुळे कावड महोत्सवात हजारोंच्या संख्येने असलेले पालखी व कावडधारी शिवभक्त कसे एकत्र येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अर्थातच, देशावर आलेले कोरोनाचे संकट व मागील काही दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.बच्चू कडू व जिल्हा प्रशासन काय निर्णय घेतात, याकडे शिवभक्तांचे लक्ष लागले आहे.अकोलेकरांच्या हिताचा व्हावा विचार पावसाळ््यात कोरोनाचा पादुर्भाव वाढत चालला असून, रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शहरातील प्रमुख गणेश मंडळांसोबत संवाद साधत सार्वजनिक उत्सव छोटेखानी स्वरूपात आयोजित करण्याचे आवाहन केले होते. ही बाब पाहता पालकमंत्री ना.बच्चू कडू यांनीसुद्धा अकोलेकरांच्या हिताचा विचार करूनच ठोस निर्णय घ्यावा, असा सूर पालखी व कावडधारी शिवभक्तांमधून उमटू लागला आहे.

शिवभक्तांच्या नैतिक जबाबदारीत वाढकावड महोत्सवाचे आकर्षण असलेल्या सर्वात मोठ्या,आकर्षक व सामाजिक संदेश देणाऱ्यांमध्ये जुने शहरातील शिवभक्त मंडळांचा समावेश होतो. यामध्ये प्रामुख्याने डाबकी रोडवासी मित्र मंडळ, जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळ, हरिहर शिवभक्त मंडळ, जय भवानी शिवभक्त मंडळांचा समावेश आहे. कावडमध्ये सहभागी होणाºया शिवभक्तांची संख्या व कोरोनाचे सावट पाहता यंदा शिवभक्त मंडळांच्या नैतिक जबाबदारीत वाढ झाल्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाIndian Festivalsभारतीय सणIndian Traditionsभारतीय परंपराcorona virusकोरोना वायरस बातम्या