शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

अकोलेकरांचे पाण्यासाठी हाल होण्याची चिन्हं! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:08 IST

अकोला मनपा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ४ कोटी २३ लाखांचा पाणी पुरवठा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना अद्यापही विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देचार कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पोहोचलाच नाही

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोलेकरांना पाणी पुरवठा करणार्‍या महान धरणात अवघा आठ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा पारा चाळिशीच्या घरात पोहोचला आहे. तापत्या उन्हामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता धरणातील जलसाठा किती दिवस तग धरेल, याचा नेम नाही. अशा स्थितीत मनपा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ४ कोटी २३ लाखांचा पाणी पुरवठा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना अद्यापही विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची माहिती आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतरही ४ कोटी २३ लाखांच्या निधीला शासन मंजुरी देते की मनपा निधीतून कामे करावे लागतील, यावर संभ्रमाची स्थिती आहे. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे महान धरणातील जलसाठय़ात किंचितही वाढ झाली नाही. सद्यस्थितीत महान धरणात अवघा आठ टक्के  जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाचा चढता पारा ध्यानात घेता बाष्पीभवनामुळे धरणातील जलसाठय़ात झपाट्याने घट होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती पाहता मनपा प्रशासनाकडून अकोलेकरांना आठ दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास अकोलेकरांना जून महिन्यांपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, असा प्रशासनाचा दावा आहे. महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या सूचनेनुसार जलप्रदाय विभागाने अवाजवी बाबींना फाटा देत ४ कोटी २३ लाखांचा पाणी टंचाईचा प्रस्ताव तयार केला. पाणी टंचाईवरील उपाययोजना व त्यांची कामे लक्षात घेता या विषयावर १७ मार्च रोजी विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सदर बैठकीत हा प्रस्ताव सात दिवसांच्या आत शासनाकडे सादर करण्यावर एकमत झाले होते. या बैठकीला चौदा दिवसांचा कालावधी होत असला, तरी अद्यापही सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची माहिती आहे. 

मनपा आयुक्तांनी तयार केला ‘रिअँलिस्टिक’ प्रस्तावसंभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता मनपाच्या जलप्रदाय विभागाने पर्यायी जलस्रोतांची चाचपणी करीत शहरातील नादुरुस्त हातपंप, विहिरी, सबर्मसिबल पंपांच्या दुरुस्तीसह प्रभागांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १४ कोटी ६0 लाखांचा आराखडा तयार केला होता. त्यामध्ये विहिरींचे खोलीकरण करणे तसेच नवीन विहिरींच्या अधिग्रहणाचा समावेश होता. मनपाच्या सर्वसाधारण सभेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्तांनी १४ कोटी ६0 लाखांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विहिरींचे खोलीकरण, अधिग्रहण तसेच टॅँकरद्वारे प्रभागांना होणार्‍या पाणी पुरवठय़ाच्या प्रस्तावाला कात्री लावत ४ कोटी २३ लाखांचा ‘रिअँलिस्टिक’आराखडा तयार केला, हे येथे उल्लेखनीय.

निधीवर संभ्रम; शासनाकडे लक्षमनपाने तयार केलेला ४ कोटी २३ लाखांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला, तरी त्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल का, याबद्दल संभ्रमाची स्थिती आहे, अन्यथा मनपा प्रशासनाला आर्थिक तरतूद करावी लागेल. ही बाब लक्षात घेता मनपाने हातपंप, सबर्मसिबल पंपांच्या दुरुस्तीसाठी किती खर्च येणार, याचे कंत्राटदारांकडून दर मागितले असल्याची माहिती आहे. 

..तर पाणी पुरवठा योजनेची गरजच नाही!भूजल सर्वेक्षण विभागाचे निकष-नियम पायदळी तुडवित महापालिकेने शहरात उभारलेल्या हातपंप, सबर्मसिबल पंपांची संख्या लक्षात घेतली की डोके गरगरण्याची वेळ येते. शहरात एकूण ३ हजार ५0७ हातपंप असून, सबर्मसिबल पंपांची संख्या ९७१ आहे. सार्वजनिक विहिरींची संख्या ९८ आहे. शहराच्या कानाकोपर्‍यात उभारलेल्या हातपंप, सबर्मसिबल पंपांची ही संख्या पाहता शहरात महान धरणातून होणार्‍या पाणी पुरवठा योजनेची गरजच नसल्याचे मत या क्षेत्रातील जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. - 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाwater transportजलवाहतूक