शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

अकोलेकरांचे पाण्यासाठी हाल होण्याची चिन्हं! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 01:08 IST

अकोला मनपा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ४ कोटी २३ लाखांचा पाणी पुरवठा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना अद्यापही विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देचार कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पोहोचलाच नाही

आशिष गावंडे । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोलेकरांना पाणी पुरवठा करणार्‍या महान धरणात अवघा आठ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मार्च महिन्यातच उन्हाचा पारा चाळिशीच्या घरात पोहोचला आहे. तापत्या उन्हामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन लक्षात घेता धरणातील जलसाठा किती दिवस तग धरेल, याचा नेम नाही. अशा स्थितीत मनपा प्रशासनाने संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता ४ कोटी २३ लाखांचा पाणी पुरवठा प्रस्ताव तयार केला. हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सादर करणे अपेक्षित असताना अद्यापही विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची माहिती आहे. सदर प्रस्ताव शासनाकडे सादर केल्यानंतरही ४ कोटी २३ लाखांच्या निधीला शासन मंजुरी देते की मनपा निधीतून कामे करावे लागतील, यावर संभ्रमाची स्थिती आहे. गतवर्षी पावसाने हुलकावणी दिल्यामुळे महान धरणातील जलसाठय़ात किंचितही वाढ झाली नाही. सद्यस्थितीत महान धरणात अवघा आठ टक्के  जलसाठा उपलब्ध आहे. उन्हाचा चढता पारा ध्यानात घेता बाष्पीभवनामुळे धरणातील जलसाठय़ात झपाट्याने घट होण्याची चिन्हे आहेत. संभाव्य पाणी टंचाईची परिस्थिती पाहता मनपा प्रशासनाकडून अकोलेकरांना आठ दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास अकोलेकरांना जून महिन्यांपर्यंत पाणी पुरवठा केला जाऊ शकतो, असा प्रशासनाचा दावा आहे. महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या सूचनेनुसार जलप्रदाय विभागाने अवाजवी बाबींना फाटा देत ४ कोटी २३ लाखांचा पाणी टंचाईचा प्रस्ताव तयार केला. पाणी टंचाईवरील उपाययोजना व त्यांची कामे लक्षात घेता या विषयावर १७ मार्च रोजी विभागीय आयुक्तांकडे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. सदर बैठकीत हा प्रस्ताव सात दिवसांच्या आत शासनाकडे सादर करण्यावर एकमत झाले होते. या बैठकीला चौदा दिवसांचा कालावधी होत असला, तरी अद्यापही सदर प्रस्ताव विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरीसाठी अमरावती येथील कार्यालयात पडून असल्याची माहिती आहे. 

मनपा आयुक्तांनी तयार केला ‘रिअँलिस्टिक’ प्रस्तावसंभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता मनपाच्या जलप्रदाय विभागाने पर्यायी जलस्रोतांची चाचपणी करीत शहरातील नादुरुस्त हातपंप, विहिरी, सबर्मसिबल पंपांच्या दुरुस्तीसह प्रभागांना टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी १४ कोटी ६0 लाखांचा आराखडा तयार केला होता. त्यामध्ये विहिरींचे खोलीकरण करणे तसेच नवीन विहिरींच्या अधिग्रहणाचा समावेश होता. मनपाच्या सर्वसाधारण सभेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर हा प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांमार्फत विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करण्यात आला होता. विभागीय आयुक्तांनी १४ कोटी ६0 लाखांचा प्रस्ताव नाकारल्यानंतर महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी विहिरींचे खोलीकरण, अधिग्रहण तसेच टॅँकरद्वारे प्रभागांना होणार्‍या पाणी पुरवठय़ाच्या प्रस्तावाला कात्री लावत ४ कोटी २३ लाखांचा ‘रिअँलिस्टिक’आराखडा तयार केला, हे येथे उल्लेखनीय.

निधीवर संभ्रम; शासनाकडे लक्षमनपाने तयार केलेला ४ कोटी २३ लाखांचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला, तरी त्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देईल का, याबद्दल संभ्रमाची स्थिती आहे, अन्यथा मनपा प्रशासनाला आर्थिक तरतूद करावी लागेल. ही बाब लक्षात घेता मनपाने हातपंप, सबर्मसिबल पंपांच्या दुरुस्तीसाठी किती खर्च येणार, याचे कंत्राटदारांकडून दर मागितले असल्याची माहिती आहे. 

..तर पाणी पुरवठा योजनेची गरजच नाही!भूजल सर्वेक्षण विभागाचे निकष-नियम पायदळी तुडवित महापालिकेने शहरात उभारलेल्या हातपंप, सबर्मसिबल पंपांची संख्या लक्षात घेतली की डोके गरगरण्याची वेळ येते. शहरात एकूण ३ हजार ५0७ हातपंप असून, सबर्मसिबल पंपांची संख्या ९७१ आहे. सार्वजनिक विहिरींची संख्या ९८ आहे. शहराच्या कानाकोपर्‍यात उभारलेल्या हातपंप, सबर्मसिबल पंपांची ही संख्या पाहता शहरात महान धरणातून होणार्‍या पाणी पुरवठा योजनेची गरजच नसल्याचे मत या क्षेत्रातील जलतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. - 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाwater transportजलवाहतूक