शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र हलविले तारसा येथे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:08 IST

अकोला:  यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने  संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे अनेक संशोधनांचे केंद्र येथून हलवण्यात आले असून, कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र नागपूरनजीक असलेल्या तारसा येथे, तर कडधान्य संशोधन केंद्र वाशिम बायपास येथे हलविण्यात आले.  

ठळक मुद्देडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठकडधान्य संशोधन केंद्र वाशिम बायपासवरकायमस्वरू पी पाण्याचा स्रोत उपलब्ध नसल्याचा परिणाम

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला:  यावर्षी पाऊसच पूरक झाला नाही. शरद सरोवर विमानतळ विस्तारीकरणात गेले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आता कायमस्वरू पी पाण्याचा स्रोतही उपलब्ध नसल्याने  संशोधन जगविण्यासाठी शास्त्रज्ञांना धडपड करावी लागत आहे. या सर्व प्रतिकूल परिस्थिमुळे अनेक संशोधनांचे केंद्र येथून हलवण्यात आले असून, कृषी विद्यापीठाच्या अकोला मुख्यालयातील ऊस संशोधन केंद्र नागपूरनजीक असलेल्या तारसा येथे, तर कडधान्य संशोधन केंद्र वाशिम बायपास येथे हलविण्यात आले.  कृषी विद्यापीठाकडे जवळपास ५ हजार एकराच्यावर शेतजमीन आहे. यात मुख्य बीजोत्पादन क्षेत्र वणीरंभापूर, मध्यवर्ती संशोधन केंद्रांतर्गत सर्वाधिक शेतजमीन आहे. या दोन्ही प्रक्षेत्रावर विविध संशोधन कंेद्रे आहेत; पण पाणीच उपलब्ध नसल्याने या संशोधन केंद्रांतर्गत संशोधनाचे काम करणार्‍या शास्त्रज्ञांपुढे आव्हान आहे. कमी खर्चाचे तंत्रज्ञान, कृषी निविष्ठा अर्थात बी-बियाणे संशोधन करू न शेतकर्‍यांना उपलब्ध करू न देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्याकरिता शास्त्रज्ञांच्या वेतनावर शासन मोठा खर्च करीत आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद, केंद्र व राज्य शासन संशोधनाकरिता निधी उपलब्ध करू न देते. तथापि, यावर्षी पाऊस नाही आणि पाण्याचा कायमस्वरू पी स्रोत उपलब्ध नसल्याने हिवाळय़ातच रब्बी पिकांच्या पेरणीचा प्रश्न उपस्थित झाला. आताच ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्य़ात शास्त्रज्ञांना हातावर हात धरू न बसण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठावर मागासलेल्या विदर्भाची मोठी जबाबदारी आहे. या कृषी विद्यापीठाने अनेक वाण विकसित करू न शेतकर्‍यांना दिलासा दिला आहे; पण अलीकडच्या पाच-सात वर्षात पावसाची अनिश्‍चितता बघता संशोधन, बीजोत्पादनावर परिणाम होत आहेत.  रब्बी हंगामातील पिकांचे बीजोत्पादन घेतले जाते; परंतु पाणी नसल्याने बीजोत्पादनावरही परिणाम होत आहे. यावर्षीची परिस्थिती तर खूपच वेगळी आहे. पाणीच नसल्याने रब्बीचे उत्पादन घेणार कसे, यासाठीची कसरत सध्या विद्यापीठात सुरू  आहे. 

पूर्व विदर्भात साखर कारखाने!पूर्व विदर्भात साखर कारखाने असून, वातावरण अनुकूल असल्याने अकोल्याचे ऊस संशोधन केंद्र तारस्याला हलविण्यात आले. तारस्याला मनुष्यबळाची वानवा असून, तेथील मुख्यालयात राहण्यासाठी कर्मचारी नाहीत. त्यामुळे कृषी विद्यापीठाला प्रथम ही व्यवस्था करावी लागणार आहे. वाशिम बायपास येथे पाण्याची बर्‍यापैकी मुबलकता असल्याने कडधान्य संशोधन केंद्र तेथे हलवले. या अगोदर नवेगाव बांध येथे ऊस संशोधन केंद्र होते. आजही ते रेकार्डवर आहे.

कृषी विद्यापीठात कायमस्वरू पी पाण्याचा स्रोत नाही हे खरे आहे. उन्हाळ्य़ात परिस्थिती गंभीर होईल त्यासाठी विदर्भात जेथे पाणी उपलब्ध आहे तेथे येथील संशोधन केंद्र हलविले जात आहे. पूर्व विदर्भात साखर कारखाने आहेत. तेथे बारमाही पाणी उपलब्ध करावे लागेल.- डॉ. व्ही.एम. भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

टॅग्स :Dr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठAkola cityअकोला शहर