शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

देशाला उत्तम कृषी शास्त्रज्ञ देणार! - आदित्य कुमार मिश्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 11:00 IST

केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. आदित्य कुमार मिश्रा यांचा ‘लोकमत’शी संवाद

- राजरत्न सिरसाट

अकोला : देशातील वाढत्या लोकसंख्येला अन्नधान्याची पूर्तता आता करावी लागणार आहे. तद्वतच शेतकºयांच्या शेतमाल उत्पादन आणि उत्पन्नात भर घालण्यासाठी मूल्यवर्धनासोबतच त्यांना बाजारपेठ उपलब्ध करू न देणे गरजेचे आहे. यादृष्टीने देशातील कार्यक्षम शास्त्रज्ञांची निवड करू न (आयसीएआर)भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संस्थांना मिळवून देणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. आदित्य कुमार मिश्रा यांनी खास ‘लोकमत’ला दिली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी ते अकोला येथे आले होते.

प्रश्न: ‘आयसीएआर’च्या देशात व या राज्यात किती संशोधन संस्था आहेत?

उत्तर: देशात ११० वर संशोधन संस्था असून, या राज्यात आठच्यावर संस्था आहेत. देशात जितकी पिके घेतली जातात, त्या सर्व पिके, संशोधनावर या संस्थांमध्ये काम चालते. या राज्यात कापूस, संत्रा, द्राक्ष, डाळिंब, कांदा, अद्रक, माती परीक्षण व भूमी नियोजन इत्यादी संस्था आहेत. नाशिक जिल्ह्यात द्राक्ष, कांदा, अद्रक आदींवर काम केले जाते. नागपूर येथे कापूस, संत्रा, माती परीक्षणावर काम करण्यात येत आहे. तसेच कृषी विद्यापीठांनाही आयसीएआरचे संशोधन प्रकल्प दिले जातात.

प्रश्न: या माध्यमातून या राज्यातील शेतकºयांना काय मिळणार?

उत्तर: कोणाला काय मिळणार, हे महत्त्वाचे नाही, तर शेतकºयांचे उत्पादन व उत्पन्न दुप्पट करणे, हे केंद्र शासनाचे उद्दिष्ट आहे. त्यानुषंगाने काम करायचे असून, शेतकºयांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी कार्यक्षम अधिकारी, शास्त्रज्ञांची गरज भासणार आहे. तेच काम शास्त्रज्ञ भरती मंडळ करणार आहे.

प्रश्न: याच संस्थांसाठी कार्यक्षम शास्त्रज्ञांची निवड करणार का?

उत्तर: देशात नैसर्गिक संसाधने मुबलक आहेत. या संसाधनांचा वापर करू न शेती व शेतकरी कसा समृद्ध होईल, हे महत्त्वाचे आव्हान आहे. कृषी क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन घडवायचे असेल, तर तसे शास्त्रज्ञ, संचालक हवे आहेत. आयसीएआरच्या मागणीनुसार आम्ही देशातील विविध संस्थांमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ शोधून, गुणवत्तेनुसार भरती करणार आहोत. प्रश्न: सध्या किती शास्त्रज्ञांची निवड केली? उत्तर: आम्ही वरिष्ठ शास्त्रज्ञ, (डायरेक्टर) संचालक भरती करीत असतो. आयसीएआरच्या मागणीनुसार ७२ संचालक, शास्त्रज्ञांची भरती करायची आहे. त्यातील ८ जागा भरण्यासाठीच्या मुलाखती घेतल्या असून, सहा जणांना वेगवेगळ्या संशोधन संस्थांमध्ये कार्यरत होण्याचे पत्र दिले आहे. इतर जागा लवकरच भरण्यात येणार आहेत.  

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेतीscienceविज्ञान