शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा; अन्यथा मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन! - रविकांत तुपकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2020 5:59 PM

अकोला : पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ रुपये मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यात याव्या अन्यथा राज्यातील ...

ठळक मुद्देपीक नुकसान भरपाइ हेक्टरी २५ हजार रुपये मदत द्या!केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार

अकोला: पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ रुपये मदतीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत मान्य करण्यात याव्या अन्यथा राज्यातील केंद्रीय मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार असून, त्यामध्ये वेळप्रसंगी मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी येथे दिला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टी व पुरामुळे विदर्भात सोयाबीन व कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाइपोटी सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली हेक्टरी १० हजार रुपयांची मदत अत्यंत तुटपुंजी आहे. त्यामुळे ही मदत आम्हाला मान्य नसून, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्याची मागणी त्यांनी केली. सरकारकडून पैसा नसल्याचे सांगितले जाते; मात्र मंत्र्यांचे दौरे बंद झाले काय, असा सवाल करीत केंद्र आणि राज्यातील दोन्ही सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप तुपकर यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारने मनाचा मोठेपणा दाखवून राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली. पीक नुकसान भरपाइची हेक्टरी २५ हजार रुपये मदत देण्यात यावी, सीसीआय व मार्केटिंग फेडरेशनची खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावी, शेतकऱ्यांना पीक विम्याचा शंभर टक्के लाभ मिळावा, सोयाबीन खरेदीचे प्रती क्विंटल ६ हजार रुपये भाव स्थिर करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या, कर्जमाफीच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तातडीने देण्यात यावा, वीज देयक माफ करण्यात यावे आदी शेतकऱ्यांच्या मागण्या ५ नोव्हेंबरपर्यंत सरकारने मान्य कराव्या अन्यथा स्वभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यात केंद्रातील मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये वेळप्रसंगी मंत्र्यांचे कपडे फाडो आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांसोबतच पीक नुकसानाचा चुकीचा अहवाल शासनाकडे पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांचेही कपडो फाडो आंदोलन करण्यात येणार आहे, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष दामुअण्णा इंगोले, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात नेत्यांनी पाहणी करून केले ‘फोटेसेशन’!

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील पीक नुकसानाची नेत्यांनी पाहणी करून ‘फोटोसेशन’ केले; परंतु या नेत्यांनी विदर्भातील पीक नुकसानाची पाहणी केली नाही. त्यामुळे विदभात शेतकरी नाहीत काय, असा सवाल तुपकर यांनी केला. अकोला जिल्हयात परतीच्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, जिल्हा प्रशासनाने शून्य टक्के नुकसान झाल्याचा अहवाल शासनाकडे पाठविणे ही खेदजनक बाब असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

कृषी कायदे शेतकऱ्यांना आत्महत्यांच्या दारात उभे करणारे!

केंद्रातील मोदी सरकारने केलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना आत्महत्यांच्या दारात उभे करणारे असल्याचा आरोप करीत, हमीभावापासून सरकारला दूर जायचे असून, त्यासाठी कृषी कायदे पारित करण्यात आले; परंतु शेतमालाला हमी भाव मिळाला नाही तर शेतकरी उदध्वस्त होइल, असेही तुपकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाAkolaअकोला