शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

९ वर्षात वाढले ७८ लाख विजेचे ग्राहक

By admin | Updated: November 15, 2014 23:45 IST

विजेचा वापर वाढला साडेचार हजार मेगावॅटने.

विवेक चांदूरकर/ अकोला जसजशी राज्याची लोकसंख्या वाढत आहे, तसतसे शहरीकरण व औद्योगिकीकरणही वाढत आहे. त्यामुळे सहाजिकच विजेचा वापरही त्याच प्रमाणात वाढला. २00५ पासून २0१४ पर्यंत राज्यात ७८ लाखांच्यावर ग्राहक वाढले असून, या ९ वर्षात विजेचा वापर साडेचार हजार मेगावॅटने वाढला आहे. राज्याची लोकसंख्या ११ कोटीच्या जवळपास असून, शहरीकरण मोठय़ा प्रमाणात होत आहे. सोबतच विभक्त कुटुंबांच्या संख्येतही वाढ होत आहे. वीज ही आधुनिक युगात जीवनावश्यक बाब बनली असून विजेच्या मागणीतही मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. राज्यात महावितरणचे २00५ साली १ कोटी ३६ लाख ५६ हजार ग्राहक होते. १ ऑक्टोबर २0१४ पर्यंत यामध्ये ७८ लाख १६ हजार ग्राहकांनी वाढ होऊन आता राज्यात २ कोटी १४ लाख ७२ हजार ग्राहक झाले आहेत. एवढय़ा ग्राहकांना सेवा पुरविणारी महावितरण ही विद्युत क्षेत्रातील आशियातील सर्वात मोठी कंपनी बनली आहे. २00५ मध्ये राज्यात १२,५00 मेगावॅट विजेचा वापर होत होता. आता त्यामध्ये वाढ होऊन ऑक्टोबर २0१४ मध्ये १७ हजार मेगावॅटच्या वर विजेची मागणी होत आहे. विजेचा वापर वाढल्यामुळे वीज निर्मितीपासून, वीज ग्राहकांच्या घरापर्यंत पोहोचविण्यापर्यंत सर्वच बाबींचा विस्तार झाला आहे. राज्यात २00५ साली १ हजार ७७0 उपकेंद्र होते तर २0१४ साली त्यामध्ये ५१ टक्क्यांनी वाढ होऊन २ हजार ६८0 उपकेंद्र झाले आहेत. फिडरनिहाय भारनियमन करणारी महावितरण देशातील एकमेव कंपनी असून, ४२ टक्क्यांपेक्षा जास्त गळती असलेल्या भागात भारनियमन करण्यात येत आहे. त्यामुळे विद्युत गळतीवर अंकुश मिळविण्यात महावितरणला काही प्रमाणात यश आले आहे. ज्या प्रमाणात विजेच्या ग्राहकांमध्ये वाढ होत आहे, त्या प्रमाणात वीज निर्मितीत वाढ होत नसल्याचे वास्तव आहे. महावितरणने गत दहा वर्षांमध्ये नवनवीन प्रयोग राबवून ग्राहकांना नियमित व अखंड वीज देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. सध्या विजेची मागणी १७ हजार मेगावॅट आहे. तरीही महावितरण संपूर्ण राज्यातील ग्राहकांपर्यंत वीजपुरवठा सुरळीत करीत असल्याचे महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (सांघिक महावि तरण) राम दोतोंडे यांनी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले.