शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

अकोला  जिल्ह्यातील ४१८ गावांत पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 2:41 PM

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली.

ठळक मुद्दे जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या. या उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात आला. एप्रिल अखेरपर्यंत ६०४ गावांसाठी ५४० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

अकोला : जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी कृती आराखड्यात ५३४ गावांसाठी १ हजार ८४ उपाययोजनांची कामे प्रस्तावित असली तरी, एप्रिल अखेरपर्यंत जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा तोंडावर आल्याच्या पृष्ठभूमीवर प्रलंबित पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.तापत्या उन्हासोबतच अकोला जिल्ह्यातील विविध भागात पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले असून, टंचाईग्रस्त गावांमधील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विविध उपाययोजनांचा कृती आराखडा मंजूर करण्यात आला. त्यामध्ये जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १ हजार ८४ उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या असून, या उपाययोजनांच्या कामांसाठी २६ कोटी ८५ लाख ३८ हजार रुपयांचा अपेक्षित खर्च प्रस्तावित करण्यात आला. कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी संबंधित यंत्रणांच्या प्रस्तावानुसार एप्रिल अखेरपर्यंत ६०४ गावांसाठी ५४० उपाययोजनांच्या कामांना जिल्हाधिकाºयांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ६७७ कामे अद्याप प्रलंबित आहेत. पावसाळा सुरू होण्यास वीस दिवसांचा कालावधी उरला असून, पाऊस सुरू झाल्यास पाणीटंचाई निवारणाची कामे करता येणार नाहीत. त्यानुषंगाने जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाची प्रलंबित कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण होणार की नाही आणि टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उपाययोजनांची केलेली  अशी आहेत कामे !जिल्ह्यातील ४१८ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजनांची ४०७ कामे पूर्ण करण्यात आली. त्यामध्ये विंधन विहिरी, कूपनलिका, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पुरक नळ योजना, टँकरद्वारे पाणी पुरवठा व खासगी विहिरींचे अधिग्रहण इत्यादी उपाययोजनांच्या कामांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाWaterपाणी