शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

२२२0 प्रवासी फेऱ्या रद्द; एसटीला  ४0 लाखांचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:57 IST

संचारबंदीचा फटका परिवहन महामंडळाला बसला असून, गत आठ दिवसांमध्ये परिवहन महामंडळाचे ४0 लाखांवर उत्पन्न बुडाले आहे.

- नितीन गव्हाळे

अकोला: सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संचारबंदीमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले आहेत. राज्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाºया एसटी बसेसची चाकेसुद्धा थांबली आहेत. संचारबंदीचा फटका परिवहन महामंडळाला बसला असून, गत आठ दिवसांमध्ये परिवहन महामंडळाचे ४0 लाखांवर उत्पन्न बुडाले आहे. एसटीला आतापर्यंत १ लाख ४६ हजार ५२ किलोमीटरपर्यंतचा प्रवास रद्द कराव्या लागल्या आहे. कोरोना व्हायरसमुळे अकोला विभागातील अकोला व वाशिम जिल्ह्यातील बसस्थानकांवर प्रवासी फिरकत नसल्यामुळे एसटी बसगाड्या थांबल्या आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली असल्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत. बसस्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या गर्दीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. अकोला आगारामध्ये परिवहन विभागाच्या एकूण ४१५ बसगाड्या आहे. या सर्व बसगाड्या तालुक्यांसह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेकडो गावांमध्ये फेºया करतात; परंतु गावागावांमध्ये लोकांना बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्या पृष्ठभूमीवर एसटी बसगाड्यांची चाके थांबली आहे. अकोला आगारातील तब्बल ४१५ बसगाड्या बसस्थानकावरील वर्कशॉपमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. प्रवास फेºयाच बंद असल्यामुळे वाहक, चालकांनी सुटी देण्यात आली आहे. अकोला विभागातील बसगाड्यांच्या तब्बल २ हजार २२0 फेºया रद्द करण्यात आल्या आहे. त्यामुळे गत आठ दिवसांपासून परिवहन विभागाचे मोेठे आर्थिक नुकसान होत आहे. यासोबतच परिवहन महामंडळाच्या अकोला आगाराने विद्यार्थिनींसाठी सुरू केलेल्या मानव विकास मिशन अंतर्गत ९ हजार ५९४ किलोमीटरच्या एकूण ३९८ बस फेºयारद्द केल्या आहेत. राज्यात सर्वत्र परिवहन महामंडळाला कोरोनामुळे लागू केलेल्या संचारबंदीचा फटका सहन करावा लागत आहे.

टॅग्स :state transportएसटीAkolaअकोला