शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
4
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
5
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
6
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
7
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
8
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
9
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
10
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
11
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
12
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
13
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
14
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
15
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
16
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
17
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
18
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
19
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
20
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन

१७७ गावांत पाणीटंचाई निवारणाची १९८ कामे पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 2:06 PM

१७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १९८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.

अकोला: जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ४ मे पर्यंत १७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी १९८ उपाययोजनांची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत.जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही तालुक्यातील विविध भागात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. या पृष्ठभूमीवर यावर्षी जिल्ह्यातील पाणीटंचाई निवारणाच्या कृती आराखड्यात जिल्ह्यातील ४४६ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी विविध ५६९ उपाययोजनांची कामे प्रस्तावित करण्यात आली. पाणीटंचाई निवारण कृती आराखड्यातील प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी ४ मेपर्यंत प्रत्यक्षात जिल्ह्यातील १७७ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची कामे पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित २६९ गावांमधील पाणीटंचाई निवारणासाठी ३७१ उपाययोजनांची कामे अद्याप प्रलंबित आहेत. त्यानुषंगाने कृती आराखड्यात प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांपैकी प्रलंबित पाणीटंचाई निवारणाची कामे केव्हा पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.उपाययोजनांची अशी पूर्ण करण्यात आली कामे!उपाययोजना                            गावे                 कामेनवीन विंधन विहिरी                 ३४                    ३८कूपनलिका                               ६९                    ७४तात्पुरती पूरक नळ योजना       ०१                   ०१खासगी विहिरींचे अधिग्रहण      ७१                   ८३टँकरद्वारे पाणीपुरवठा             ०२                    ०२........................................................................एकूण                                      १७७                    १९८‘या’ गावांत सुरू आहे टँकरद्वारे पाणीपुरवठा!जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील पाणीटंचाईग्रस्त पुनोती बु. आणि देवदरी (वरखेड) या दोन गावांमध्ये ४ मेपासून दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदwater scarcityपाणी टंचाई