शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कीटकनाशक फवारणीमुळे दोन महिन्यांत १२१ जणांना विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 14:17 IST

अकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटनांमध्ये वाढच होत असून, गेल्या दोन महिन्यांत तब्बल ९९ जणांना विषबाधा झाली.

ठळक मुद्देजुलै- २१, आॅगस्ट- ७७, त्यापूर्वीच्या मिळून १२१ विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात तब्बल ९९ जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली.आॅगस्टमध्ये ७७ शेतकरी, मजुरांना झालेल्या विषबाधेच्या घटनांमध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे.

- सदानंद सिरसाटअकोला : कीटकनाशकाच्या फवारणीतून विषबाधा झाल्याच्या घटनांमध्ये वाढच होत असून, गेल्या दोन महिन्यांत तब्बल ९९ जणांना विषबाधा झाली, त्यापैकी एकाचा मृत्यू, तर गंभीर असलेल्या १३ जणांवर ३१ आॅगस्टपर्यंतच्या काळात उपचार सुरू असल्याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कृषी विभागाला दिला आहे. हंगाम सुरू झाल्यापासून १२१ जणांना फवारणीतून विषबाधा झाल्याची माहिती आहे.गेल्यावर्षीच्या संपूर्ण खरीप हंगामात अकोला जिल्ह्यात १०४ शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातील मृत्यूच्या संख्येमुळे शासनही हादरले. तोच प्रकार यावर्षीही मोठ्या प्रमाणात घडत असल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी राज्यात कीटकनाशकांची हाताळणी विषबाधा आणि शेकडो मृत्यूच्या घटनांची पडताळणी उत्तर प्रदेशातील फरिदाबाद येथील केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समितीने केली. त्यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उजेडात आल्या होत्या.ऊस पिकासाठी शिफारस केलेले कीटकनाशके, ज्या भागात ते पीक घेतले जात नाही, तेथेही पुरवठा करण्यात आले. त्या कीटकनाशकांची शिफारस केलेल्या पिकांचा पेरा नसताना इतर पिकांसाठी त्याचा वापर केल्याने शेतकरी आणि मजुरांना विषबाधा झाल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले. यापुढे असे प्रकार घडल्यास कारवाईसाठी जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा मंडळाने राज्याच्या कृषी विभागाला दिला. आता अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालानुसार जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात तब्बल ९९ जणांना विषबाधा झाल्याची प्रकरणे पुढे आली. त्यापैकी आॅगस्टमध्ये ७७ शेतकरी, मजुरांना झालेल्या विषबाधेच्या घटनांमध्ये एकाचा मृत्यूही झाला आहे. १३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. जुलै- २१, आॅगस्ट- ७७, त्यापूर्वीच्या मिळून १२१ विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आता कुणावर कारवाई निश्चित होते, हे लवकरच पुढे येणार आहे.

कंपनी-कृषी अधिकारीही जबाबदारउत्पादक कंपन्यांनी कीटकनाशकांचा पुरवठा करताना त्या भागातील पीक पद्धती, त्या पिकांसाठी केंद्रीय कीटकनाशके मंडळ व नोंदणी समिती, फरिदाबाद यांनी शिफारस आणि मंजुरी दिलेल्या कीटकनाशकांचाच पुरवठा करावा, असे निर्देश देण्यात आले. पीकनिहाय शिफारस असलेले कीटकनाशक एखाद्या भागात ते पीक नसताना पुरवठा केल्यास कारवाई केली जाणार आहे. कीटकनाशकांची साठवणूक, वितरण, विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कृषी विभागाचे सर्व संबंधित अधिकारी आणि कंपनीवरही कारवाईचा इशारा देण्यात आला होता.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयFarmerशेतकरीagricultureशेती